बस परवडत नसल्याचे बसमालकांचे म्हणणे : सरकराने लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी
सांखळी : सांखळीसह राज्यातील सर्व ग्रामीण भागात रविवारी खासगी बसेस उपलब्ध होत नसल्याने सामान्य माणसाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या समस्येकडे लक्ष देऊन सामान्य जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी जोर धरत आहे. उपलब्ध माहिती नुसार राज्यात बहुतेक ठिकाणी रविवारी बसमालक न संगता सुट्टी घेत असल्याने सामान्य गरीब प्रवाशांना त्याचा जास्त फटका बसत असल्याने अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. काही प्रवाशांना पायलट परवडत नासतानाही न्यावा लागतो तर काहींना तास दोन तास कोणी मिळतो का याची वाट बघत थांबावे लागते अशी कैफियत प्रवाशांनी मांडली. सरकारी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर समस्या सोडवावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
बस परवडत नाही : बस मालक
रविवारी सुट्टी असल्याने हवेतसे प्रवाशी मिळत नसल्याने चांगली मिळकत होत नाही. काही वेळा डिझलाही पदरचे पैसे द्यावे लागतात. बसचालकांना वेगळा भत्ता, सरकारने दिलेला तिकीट दर आधीच परवडत नाही. तसेच सरकारने बसवलेले विविध कर, बसचे दुऊस्ती काम, टायर याचे भाव गगनाला भिडले आहेत. सरकारने आमच्याही समस्या जाणून घेणे आवश्यक असल्याचे खासगी बस मालकांचे म्हणणे आहे.
आम्ही आय कार्डही मागू नये काय?
एका बसमध्ये चडलेल्या विद्यार्थ्याने हाफ तिकीटासाठी सवलत कार्ड दाखवले नाही. तो विद्यार्थी गणवेशातही नव्हता. त्याच्याकडून पूर्ण तिकीट घेतले म्हणून त्याने बसवाल्याविरुद्ध तक्रार केली. बसमालकास चार हजार दंड वाहतूक खात्dयाला भरावा लागला. दहा ऊपयांसाठी चार हजार मोजावे लागले. आम्ही कार्ड ही मागू नये का? असा प्रŽ बस मालक करत आहेत. काही गावातील लोक प्रतिनिधी लेखी तक्रारी करत असल्याने त्याचा नाहक त्रास आम्हाला ही सहन करावा लागतो असे एका बस मालकाने तऊण भारत शी बोलताना सांगितले.