संख, वार्ताहर
जत तालुक्यातील संख येथे ग्राम न्यायालय आपल्या दारी आली आहे. याचा पुरेपूर फायदा ३२ गावातील पक्षकारांनी घ्यावा. व प्रलंबित खटल्याची निकालही जलद गतीने होणार आहे असे मत संख येथील ग्राम न्यायालयाचे उद्घाटनप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननिय सारंग कोतवाल यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगली, पी. के. शर्मा उपस्थित होते. प्रथम मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे आगमन झाल्याने त्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.व त्यांच्या हस्ते ग्राम न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. व सत्कार करण्यात आला. पुढे न्यायाधीश सारंग कोतवाल म्हणाले की, संख ग्राम न्यायालयाचे प्रस्ताव १९८६ मध्ये आला. वकील संघटनेने सतत पाठपुरावा केल्याने ते २ ऑक्टोंबर २००९ मध्ये पारित करण्यात आली.
संख येथे ग्राम न्यायालय झाल्यामुळे ३२ गावातील पक्षकाराने आता जत, सांगली खटल्यासाठी जावा लागणार नाही. त्यामुळे पक्षकरांचा वेळ, पैशाची बचत होणार आहे. जत येथील पक्षकारांचे सांगली येथे जावे म्हठले तर सपूर्ण दिवस सागलीतच जात आहे ते आता संख ला ग्रामन्यायालय झाल्याने सोयीचे झाले आहे.तसेच शेतीची, रस्त्याचे वाद व किरकोळ खटल्याची निकाल लवकर होण्यास मदत होणार आहे. तसेच जत येथे दोनच न्यायाधीश असल्यामुळे आठ हजार हून अधिक खटले प्रलंबित आहेत. ते ग्राम न्यायालयामुळे प्रलंबित खटल्यांची निकाल जलद गतीने होणार आहे. येत्या काळात कनिष्ठ व वरिष्ठ तसेच सेशन न्यायालय होण्यासाठी प्रयत्न करू असा न्यायाधीश सारंग कोतवाल यांनी यावेळी विश्वास व्यक्त केले.
तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगली प्रदीप शर्मा, सदस्य बार कौन्सिल महाराष्ट्र ,गोवा माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मिलिंद थोबडे, जत वकील संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर खटावे, संख ग्रामन्यायालयाचे न्यायाधिकारी एकनाथ चौगुले, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सदस्य बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे, जत तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर खटावे, प्रथम संख ग्राम न्यायालयाचे न्यायाधीश एकनाथ चौगुले, सांगलीचे कनिष्ठ,वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश, जत तहसीलदार जीवन बनसोडे, संख अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे, आमदार विक्रमसिंह सावंत , माजी आमदार विलासराव जगताप, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, उपसरपंच सुभाष पाटील, सागर पाटील,ग्रां.पं सदस्य , ग्रामविकास अधिकारी सौ. गवळी, तलाठी, मंडळ अधिकारी, आर.बी.पाटील सर,आय.एम.बिरादार,आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, जत,मिरज, सांगली, आटपाडी येथील वकील संघटनेचे अधिकारी पदाधिकारी व सदस्य, तसेच ३२ गावातील सरपंच, उपसरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्तावना सदस्य बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे केले तर आभार संख ग्राम न्यायालयाचे न्याय अधिकारी एकनाथ चौगुले यांनी मानले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रम सांगता झाले.मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.