पाऊस लांबत चालल्याने तालुक्यातील शेतकऱयांची चिंता वाढली : हवामान खात्याची कार्यपद्धती शंकास्पद
वार्ताहर /सांबरा
तालुक्मयाच्या पूर्व भागामध्ये निम्म्याहून अधिक शिवारात धूळवाफ पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र, पाऊस लांबत चालल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे.
पूर्व भागातील बसवन कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री आदी परिसरामध्ये शेतकऱयांनी धूळवाफेतील पेरण्या जवळजवळ पूर्ण केल्या आहेत. मात्र, पाऊस गायब झाला असल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. पावसाच्या भरवशावर शेतकऱयांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, पावसाअभावी बियाणांचे नुकसान होऊन शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय, अशी चिंता लागून राहिली आहे.
हवामान खात्याचा चुकीचा अंदाज आणि शेतकऱयांची धडपड
हवामान खात्याने यंदा मान्सून आठ दिवस आधीच दाखल होईल, असा अंदाज मे महिन्यामध्ये वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱयांनी तातडीने धूळवाफ पेरणीला प्रारंभ केला आहे. मात्र, मान्सून वेळेवर तर सोडाच, त्यानंतरही दाखल झाला नाही. त्यामुळे शेतकऱयांचे आभाळाकडे डोळे लागून राहिले आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास ओलीअभावी भात बियाणांचे नुकसान होऊन शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्मयता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱयांनी पेरणीची कामे आटोपली. मात्र, हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरल्याने शेतकऱयांची घोर निराशा झाली आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही हवामान खात्याचे अंदाज चुकीचे ठरत असल्याने शेतकऱयांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हवामान खात्याच्या कार्यपद्धतीवरही शंका घेण्यात येत आहे.
कडोली परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
उर्वरित पेरण्या आटोपण्यासाठी पावसाची नितांत गरज
मान्सूनने दडी मारल्याने कडोली परिसरातील भातपेरण्या खोळंबल्या असून केवळ 20 टक्के पेरण्या झाल्याने उर्वरित पेरण्या करण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे.
मान्सूनपूर्व आणि मान्सून पावसाने यावेळी पाठ फिरविली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. यापुढे पाऊस पडेल या आशेवर काही शेतकऱयांनी भातपेरण्या केल्या. पण आता पेरणी केलेली बियाणे उगवणार की नाही, याची शाश्वती नाही. कडोली परिसरातील बहुतांशी भाग भात पेरणीअभावी पडून आहे. कडक ऊन पडल्याने जमिनीतील ओलावा नाहिसा झाला आहे. त्यामुळे पेरण्या ठप्प झाल्या आहेत. काहींनी शिवारात मशागतीची कामेही उरकून घेतली नाहीत. महागडी खते आणि बियाणे खरेदी करून घरी ठेवली आहेत.
बटाटा बियाणे दाखल
यावर्षी बटाटा बियाणांचा दर वाढल्याने काही शेतकऱयांनी बटाटय़ाची लागवड करावयाची नाही, असा निर्णय घेतला. केवळ 25 टक्के माळ शिवारात बटाटे बियाणांची लागवड होणार असून याकरिता बटाटे बियाणे दाखल झाले आहे. पण पावसाने दडी मारल्याने याची लागवड वेळेत होणार की नाही, अशी चिंता लागून आहे.