जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर म्हणजेच कडधान्य तसेच इतर धान्यांवर 5 टक्के जीएसटी लागू केला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसणार आहे. त्यासाठी बेळगाव मार्केटमधील रविवारपेठ व इतर क्यापाऱयांनी शनिवार दि. 16 रोजी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना या आशयाचे निवेदन शुक्रवारी चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापाऱयांनी दिले आहे.
सर्वसामान्य जनता महागाईमुळे मेटाकुटीला आली आहे. महागाईविरोधात जनतेचा रोष आहे. असे असताना पुन्हा 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय सोमवार दि. 18 पासून केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, यामुळे महागाईचा भडका उडणार आहे. आम्हालादेखील त्याचा नाहक त्रास होणार आहे. क्यवसायावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा जीएसटी मागे घ्यावा, यासाठी व्यापाऱयांनी शनिवारी बंद पुकारला आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देऊन त्यांना याबद्दल माहिती दिली आहे. जनतेनेही आम्हाला सहकार्य करावे. बेळगाव जिल्हय़ातूनच नव्हे तर परराज्यांतूनही मोठय़ा संख्येने लहान व्यापारी, ग्राहक खरेदीसाठी येत असतात. त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या पावसाळा आहे. त्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये. मात्र सर्वांसाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. लागू करण्यात आलेली जीएसटी अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्हालाही स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे साऱयांनाच त्रास होणार आहे. तेव्हा पूर्वीप्रमाणेच आहार धान्ये जीएसटीमुक्त करावीत, अशी मागणी व्यापाऱयांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी त्याचबरोबर हिडदुग्गी ट्रेडर्स, शिवशंकर ट्रेडर्स, विजय ट्रेडर्स, हरिशंकर ट्रेडर्स यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.