बायपासवरून धावताहेत अवजड वाहने : शहरातील वर्दळ मंदावली : राजा टाईल्स-गोवा क्रॉस रस्त्याचे भाग्य उजळणार कधी?
खानापूर : बेळगाव-गोवा रस्त्याचे चौपदरी बांधकाम सुरू आहे. यातील एक टप्पा असणाऱ्या बेळगाव-खानापूर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे शहरातून होणारी अवजड तसेच इतर वाहतूक वळविल्याने शहरातील वाहतूक कमी झाली आहे. याचा परिणाम रस्त्यालगत असलेल्या व्यवसायावर झाला आहे. महिन्याभरात टोल आकारण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, राजा टाईल्स ते गोवा क्रॉस रस्त्याच्या बांधकामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त होण्याची किंवा नव्याने होण्याची आशा पूर्ण मावळली आहे. बेळगाव-गोवा रस्त्यांतर्गत येणारा बेळगाव-खानापूर रस्ता अशोक बिल्डकॉन कंपनीने तयार केला आहे. बांधकामाचा दर्जा उत्तम असून रस्त्याचे संपूर्ण काम दर्जेदार झाले आहे. राजा टाईल्स येथे हा रस्ता खानापूर शहराच्या बाहेरून वळविण्यात आला आहे. हा रस्ता न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडला होता. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून पुलाचे काम पूर्ण केले आहे. काम पूर्ण झाल्याने बेळगाव-गोवा रस्त्यावरील वाहतूक या पुलावरून सुरू करण्यात आली. बायपास रस्ता सुरू झाल्याने खानापूर शहरांतर्गत वाहनांची वर्दळ मंदावली आहे. यामुळे राजा टाईल्स ते गोवा क्रॉस रस्त्यावर असलेल्या विविध व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
टोलनाक्यावर सवलत आवश्यक
य् ाा रस्त्यावर गणेबैलनजीक टोल नाका यंत्रणा सज्ज झाली असून नोटिफिकेशन देऊन टोल वसुलीच्या प्रक्रियेस येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. यमकनमर्डी, हिरेबागेवाडी येथील टोलनाक्यांच्या ठिकाणी स्थानिकांना सवलत आहे, त्याचप्रकारे खानापूर परिसरातील नागरिकांना येथील टोलनाक्यावर सवलत देण्यात येणार आहे. राजा टाईल्स ते गोवा क्रॉस हा रस्ता यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिपत्याखाली होत्या. त्यामुळे वनटाईम डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत या रस्त्याचा विकास करण्यात येणार होता. तसे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिले होते. मात्र, आता रस्ता बाहेरून सुरू झाल्याने याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने झटकली असून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतर केल्याचे प्राधिकरणचे अधिकारी सांगत आहेत. वनटाईम डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत हा रस्ता करणार असल्याचे भाजप नेत्यांनीही आश्वासन दिले होते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विविध संघटना, म. ए. समितीने आंदोलने केली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ख•s बुजवून वाहतुकीस योग्य केले होते. मात्र आता रस्ता पूर्ण झाल्याने ही जबाबदारी झटकून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दुटप्पीपणा उघड होत आहे.
शहरांतर्गत रस्ता दुरूस्तीस वेळ लागणार
य् ाा रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतर झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या मालकीचा रस्ता हस्तांतर करताना तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात. यासाठी नॅशनल हायवे जबाबदारी झटकत असून हस्तांतर होण्यास काही काळ लागणार असल्यामुळे शहरातील रस्ता दुरुस्तीस वेळ लागणार आहे.
गतिरोधक-दिशादर्शक आवश्यक
राजा टाईल्स येथून बायपास रस्ता सुरू झाला आहे. येथून खानापूर शहरात जाण्यासाठी दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. यासाठी येथे तातडीने दिशादर्शक फलक लावावेत. डुक्करवाडी फाटा येथे वेग नियंत्रक फलक नसल्याने डुक्करवाडी, हत्तरगुंजी, मुडेवाडी येथून खानापूर शहरात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांना धोका निर्माण झाल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने तातडीने गतिरोधक घालून वेग नियंत्रक फलक लावणे गरजेचे आहे. अन्यथा येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.