वंटमुरी घाटातील घटना, सात जण जखमी
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वंटमुरी घाटात रविवारी रात्री झालेल्या साखळी अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली आहे. चार वाहनांचे नुकसान झाले असून या अपघातात सात जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास कंटेनर, दोन कार व गुड्स वाहन यांच्यात साखळी अपघात झाला. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.
रात्री उशिरापर्यंत या मार्गावरील वाहतुकीची गती धिमी करण्यात आली होती. उपलब्ध माहितीनुसार वंटमुरी घाट परिसरात दुरुस्तीच्या कारणास्तव कोल्हापूरहून बेळगावकडे येणारा एका बाजूकडील मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱया एकाच मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू आहे.
रात्री साखळी अपघातानंतर या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली. ही कोंडी दूर करण्यासाठी स्वतः पोलीस उपायुक्तांना धाव घ्यावी लागली. जखमींना खासगी इस्पितळात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे सांगण्यात आले.