तालुका पंचायतमध्ये वॉटरमन-पीडीओंना देण्यात आले प्रशिक्षण
बेळगाव : जलजीवन मिशन योजना राबविण्यासाठी आता मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे ही योजना यशस्वी होईल याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले आहे. तेंव्हा ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असले तरी यासाठी कशाप्रकारे काम करावे व कोणते फायदे नागरिकांना मिळतील याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. तालुका पंचायतच्या सभागृहात या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर, पाणी पुरवठा विभागाचे अभियंते कोळी, सहाय्यक अभियंते शिवानंद, रवी बंगारप्पण्णावर, तालुका पंचायतीचे सहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेक समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात आली.
15 ऑगस्ट 2019 रोजी जलजीवन योजनेची सुरुवात
प्रशिक्षणवेळी जलजीवन मिशन (ग्रामीण) योजनेतून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या घरात पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची जोडणी केली जाणार आहे. जलजीवन मिशन योजना 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरू केली होती. ग्रामीण भागात जिथे लोकांना अजूनही पाण्याची समस्या आहे त्या भागात पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करता येईल, याबद्दल माहिती देण्यात आली.
ज्या भागात पाणी नाही तेथे पाणीपुरवठा करण्यावर भर
राज्यांच्या ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहे. अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही आणि लोकांना पाणी आणण्यासाठी अनेक अंतर पायी जावे लागते. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्या पाहून सरकारने जलजीवन मिशन योजना जेजेएम मिशन सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ज्या भागात पाणी नाही तेथे प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर द्यावा. यासाठी काय अडचण आल्यास तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही यावेळी सांगण्यात आले.
नागरिकांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून जेथे पाण्याची सुविधा नाही अशा भागात पाणीपुरवठा केला जावा, या योजनेचा (जलजीवन मिशन योजना) लाभ ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांना मिळणार आहे. जलजीवन मिशन योजनेसाठी सरकार 3.60 लाख कोटी ऊपयांच्या अर्थसंकल्पात तरतूद करणार आहे. घरोघरी पोहोचवलेले पाणी उमेदवारांना पिण्यासाठीही वापरता येईल, या अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणालाही चालना दिली जाईल. सर्व उमेदवारांना त्यांच्या घरी पाणी कनेक्शन द्यावे, आता त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फार दूर जावे लागणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळही वाचविण्यासाठी प्रयत्न करा, जलजीवन मिशन योजनेद्वारे ग्रामीण भागात घरगुती नळकनेक्शन दिले जाईल, जेजेएम मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा देण्याबराब्sारच या योजनेचा फायदाही नागरिकांना करावा, असेही सांगण्यात आले. यावेळी पिडीओ, वॉटरमन आणि पाणी पुरवठा निर्वाहक कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.