प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा- इस्लामपूर उपविभागाचे पोलीस उपधीक्षक कृष्णात पिंगळे यांची बदली झाली. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी हे आदेश दिले.
त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत. न्यायाधिकरण, न्यायालय यांचे आदेश, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पुढील कार्यवाही होणार आहे. पिंगळे यांनी गेल्या साडेतीन वर्षात सक्षम पणे वाळवा-इस्लामपूर उपविभागची जबाबदारी सांभाळली. त्यांनी आपल्या कार्यकाळात आठ मोका लावून इस्लामपूर व आष्टा शहरातील संघटीत गुन्हेगारी मोडीत काढली.कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवतातानाच पिंगळे यांनी सामाजिक बांधिलकी जपली. जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना, त्यांनी शहरात ‘माणुसकीच नात’ हा व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन सामाजिक मदतीतून गरीब व गरजू लोकांना भोजन, अन्न-धान्य पुरवले.तर ‘माणुसकीच नातं अभ्यासिका’ सुरु करून गरीब विद्यार्थ्यांना दिलासा दिला.