पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमधील नुकत्याच घडलेल्या विषारी दारूकांडानंतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांच्या मोठय़ा प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. आयपीएस अधिकारी राजविंदर सिंग भाटी यांची बिहारमध्ये नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दारूकांडानंतर अवघ्या काही दिवसात झालेला हा मोठा बदल आहे. बिहार सरकारच्या गृह विभागाने रविवारी नवीन डीजीपींच्या नावाची अधिसूचना जारी केली. राजविंदर सिंह हे बीएसएफच्या ईस्टर्न कमांडच्या एडीजी पदावर कार्यरत होते. आता त्यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.