पर्यावरण समतोलासाठी सभोवताली वृक्षारोपण करून घातली सौंदर्यात भर
वार्ताहर /हिंडलगा
मण्णूर टेकडीवरील तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेंतर्गत साडेसहा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. परिसरात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने शुक्रवारी (दि. 22) तलावाच्या सभोवताली वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवस्की पंच कमिटी अध्यक्ष मुकुंद तरळे होते.
श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास बी. सी. ट्रस्ट, देवस्की पंच कमिटी, आंबेवाडी ग्रा. पं. व तलाव विकास कमिटीच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील, उपाध्यक्षा सरिता नाईक, डाएटच्या भारती दासोग, धर्मस्थळचे जिल्हा निर्देशक प्रदीप शेट्टी, सदस्य मधुकर चौगुले, ता. पं. सदस्या रेणुका सुळगेकर, लता कडोलकर, लक्ष्मी सांबरेकर, देवस्की पंच कमिटी उपाध्यक्ष उमेश चौगुले उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर रोपाला पाणी घालून तलावाच्या सभोवताली वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रदीप शेट्टी यांनी तलावाच्या विकासाचा आढावा घेताना विविध ठिकाणच्या 415 तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात आल्याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तलावाचे पाणी जनावरे सोडून प्रदूषित न करता योग्यरीत्या वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. मान्यवरांनी आपल्या भाषणात तलावाचा कायापालट केल्याबद्दल श्रीक्षेत्र धर्मस्थळबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी ग्रा. पं. सदस्य दत्तू चौगुले, नागेश चौगुले, देवस्की पंच कमिटी उपाध्यक्ष सुजीत मंडोळकर, हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष अनिल काकतकर, प्रकल्प अधिकारी नागराज, पर्यवेक्षिका संगीता पुजारी, कृषी अधिकारी सतीश, समन्वय अधिकारी धनंजय, सेवा प्रतिनिधी जयश्री नाईक, गायत्री काकडे, कमल कांबळे यांच्यासह ग्रा. पं. सदस्य, देवस्की पंच कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.