प्रकल्पाच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल : पर्यावरणावर संकट
प्रतिनिधी. /वाळपई
पश्चिम घाटात समृद्ध इतिहास सांगणाऱया वाघेरी डोंगरावर प्रकल्पाच्या नावाखाल मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल सुरू आहे. यामुळे पर्यावरणावर मोठे संकट ओढवणार आहे.
जवळपास दोन महिन्यांपासून डोंगरावर जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी सर्रास वृक्षतोड सुरू असून डोंगर बराचसा डोंगर भाग उघडा झाला आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींकडून याची गंभीर दखल घेण्यात आली. कोणताही परवाना नसताना सर्व नियम धाब्यावर वृक्षतोड केली. त्यामुळे वन खात्याची यंत्रणा खडबडून जागी झाली. वरि÷ अधिकाऱयांनी संबधित ठिकाणी पाहणी करून सदर काम बंद करण्याचा आदेश दिला.
वन खात्याच्या अधिकाऱयांनी भेट दिली त्यावेळी डेंगरभागात यंत्राद्वारे साफसफाई व रस्ता तयार करण्याचे काम जोरदार सुरू असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारे डोंगर भागात वृक्ष संहार करून प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे अभयारण्य क्षेत्रातील जैविक संपत्ती व जीवाश्मावर प्रतिकूल परिणाम होऊन त्यांचा ऱहास होण्याची भीती आहे.