उदय सावंत /वाळपई
सत्तरी तालुका पूर्णपणे घनदाट जंगलाने वेढलेला आहे. पश्चिम घाटाचा समृद्ध इतिहास सांगणाऱया सत्तरी तालुक्मयाने आतापर्यंत जैवविविधता जपण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. तालुक्मयाच्या कानाकोपऱयात तसेच डोंगराळ भागांमध्ये राहणारा आदिवासी समाज निसर्गाचा भक्कम पुजारी आहे. निसर्गसंवर्धनाच्या प्रवाहामध्ये या समाजाने आतापर्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्यापैकीच धनगर समाज मात्र अजूनही न्यायापासून वंचित राहिला आहे. आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करताना याचाही विचार व्हायला हवा.
गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत सत्तरी तालुक्मयाच्या ग्रामीण स्तरावर मोठय़ा प्रमाणात विकास झालेला आहे. मात्र आदिवासी समाजाच्या विकासाचा खऱया अर्थाचा प्रवाह गेल्या दहा वर्षापासून सुरू झाल्याचे मान्य करावे लागेल. या समाजाने अनेकवेळा आपल्या व्यथा सरकार दरबारी मांडल्या व आपल्या अस्तित्वासाठी अनेकवेळा संघर्षही केला. मात्र त्यांच्या समस्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाहीत. सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये आजही गावडा व धनगर समाज मोठय़ा प्रमाणे वावरताना दिसत आहे?. टक्केवारीच्या तुलनेत तो कमी असला तरीसुद्धा या समाजाने सांस्कृतिक चळवळीमध्ये आपले विशेष योगदान दिलेले आहे.
घनदाट जंगलाचा समृद्ध इतिहास
सत्तरी तालुक्मयात एकूण बारा ग्रामपंचायती आहेत. पैकी काही अवघ्याच ग्रामपंचायतीच्या भागांमध्ये आदिवासी समाजाची मंडळी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. धनगर समाज एकेकाळी पूर्णपणे घनदाट जंगलामध्ये राहत होता. आज परिस्थिती हळूहळू बदलू लागलेली आहे. जंगलामध्ये म्हादई अभयारण्याच्या अधिसूचनेमुळे त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या समस्या, अडचणी यामुळे या समाजावर घनदाट जंगलाचा समृद्ध इतिहास सोडून लोकवस्तीमध्ये राहण्याची पाळी आलेली आहे.
डोंगरावरील आदिवासी पोहोचला लोकवस्तीत
वाघेरीच्या डोंगरावर राहणारा धनगर, साटरेच्या डोंगरावर राहणार धनगर अशी विशिष्ट ओळख असलेल्या धनगर समाजाने आता आपली वस्ती भुईपाल या ठिकाणी बसवलेली आहे. घनदाट जंगलामध्ये राहून निसर्गाचा पूजक म्हणून ओळख निर्माण करणाऱया या समाजाने आता बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर आपला पारंपरिक दुधाचा व्यवसाय बाजूला करून मिळेल त्याठिकाणी रोजंदारीवर काम करुन आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न चालविला आहे. धनगर समाज संघटनेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचा भक्कम पाया निर्माण करण्याचे कार्य होताना दिसत आहे. दुसऱया बाजूने पारंपरिक दूध उत्पादनाला उतरती कळा निर्माण होणार नाही याची दखल घेऊन दूध उत्पादनाच्या बाबतीतही या समाजाने आजपर्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे हे विसरता कामा नये.
धनगर समाजावर मोठा विश्वास
धनगर बांधवांकडून होणारा दुधाचा पुरवठा हा शुद्ध, पारदर्शक स्वरूपाचा असून त्यामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आजही मोठय़ा प्रमाणात धनगर समाजाच्या बांधवांनी पुरविलेल्या दुधाचा वापर होताना दिसत आहे. एवढा प्रचंड विश्वास आजही या धनगर समाजावर आहे.
सांस्कृतिक परंपरा जपणारा गावडा समाज
गावडा समाजसुद्धा अशाच प्रकारे आपले जीवन जगत आहे. पूर्णपणे जंगलात राहून आदिवासी समाजाच्या संपूर्ण सांस्कृतिक परंपरा जतन करत असताना निसर्ग हाच माझा खरा सोबती आहे. याच निसर्गाने आपल्याला जगण्याचे मोठे सामर्थ्य निर्माण करून दिले. अशा प्रकारची विचारधारा असलेला गावडा समाज आज तालुक्मयाच्या अवघ्याच भागामध्ये शिल्लक राहिलेला आहे. गुळेली पंचायत क्षेत्रातील पैकुळ, मेळावली आदी भागांमध्ये हा समाज मोठय़ा प्रमाणात आढळतो. त्याचप्रमाणे पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील धाटवाडा व बांधवाडा या भागातही हा समाज बऱयाच प्रमाणात आढळतो.
या समाजाने आपल्या समाजावर होणारा अन्याय याच्या विरोधात कधीही जेवढा संघर्ष केला नाही, त्याच्या कितीतरी पटीने जास्त आयआयटी प्रकल्पाच्या माध्यमातून या समाजाने मोठा संघर्ष केल्याचे चित्र पहावयास मिळाले. शेळ मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाचे आंदोलन हे गोव्यातील सर्वात मोठे आंदोलन असल्याचे सांगण्यात येते. या आंदोलनामुळे सरकारला सुद्धा वाकावे लागले. आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आदिवासी समाज कशा प्रकारे आपल्या जीवावर उदार होतो त्याचे चांगले व मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात उभे राहिलेल्या आंदोलन. आदिवासी समाजाने आतापर्यंत सत्तरी तालुक्मयाच्या विकासप्रवाहात मोठय़ा प्रमाणात योगदान दिलेले आहे.
आदिवासी समाजाचा विकास प्रवाह
या समाजाचा हल्लीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात काही प्रमाणात विकास झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अगोदर जंगलामध्ये त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. आज आदिवासी गावामध्ये येऊन राहात असल्यामुळे मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत.
म्हादई अभयारण्यामुळे या भागातील आदिवासी समाजासमोर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. गेल्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये या समाजाला जनावरांचा मोठय़ा प्रमाणात उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यांच्या गुराढोरांना रानटी जनावरांच्या उपद्रवाचा मोठय़ा प्रमाणात फटका बसतो आहे. जंगलामध्ये रानटी जनावरांचा उपद्रव प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे आदिवासी समाजाच्या जगण्याला अडचण निर्माण झाल्याचे पहावयास मिळते.
धनगर समाजाच्या मागणीचा विचार व्हावा
धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये कायमस्वरूपी स्थान प्राप्त व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा आजही कायम आहे. मात्र या समाजाला अजूनपर्यंत न्याय प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या समाजाची उपेक्षा आजही कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय दिवसालातरी याबाबत संबंधितांनी करायला हवा.