वेंगुर्लेकर फाईन आर्ट – आयएमबीतर्फे आयोजन
प्रतिनिधी /पणजी
वेंगुर्लेकर फाईन आर्ट सेंटर आणि आयएमबी यांच्या संयुक्त विद्यमाने सांतिनेज येथे वेंगुर्लेकर आर्ट सेंटरमध्ये कविवर्य शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गोव्यातील बारा चित्रकारांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून रामाणी यांना आदरांजली वाहिली.
चित्रांजली या प्रदर्शनाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष बुजुर्ग चित्रकार प्राचार्य दत्ता नावेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत,सन्माननीय पाहुणे आयएमबीचे अध्यक्ष तथा कवी दशरथ परब व वेंगुर्लेकर आर्ट सेंटरचे संस्थापक प्राचार्य महेश वेंगुर्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कविवर्य शंकर रामाणी यांची कविता आत्मकि जाणिवांची कविता आहे. गूढ गंभीर, आध्यात्मकि म्हणून ती दुर्लक्षित राहिली असेल कदाचित परंतु सोन्यासारखे लखलखीत असते ते त्याला झाकोळ आला तरी ते चमकणारच तशी रामाणींची कविता आता नव्याने उलगडत जाईल, चमकत जाईल. त्यांनी आत्मनि÷ व एकनि÷पणे कवितेची साधना केली आहे,असे प्रतिपादन यावेळी डॉ. अनुजा जोशी यांनी केले.
रामाणी यांची कविता दुर्बोध, गुढ म्हणून त्याकडे कोणी वळले नाहीत असे मला स्वतःला वाटत नाही असे स्पष्ट करून, प्राचार्य अनिल सामंत म्हणाले, त्यांची जाणिवेची, नेणिवेची कविता आहे व त्याकडे जातांना अनेकांची गफलत होते. संत तुकारामाच्या कवितेला दुर्बोध का म्हटले जात नाही असा प्रश्न करून रामणींच्या कवितेकडे जातांना त्यातील रंगांचाही अभ्यास करावा लागेल याची जाणीव सामंत यांनी दिली. त्यांच्या चिरकाल टिकणाऱया कवितांचा नव्याने अभ्यास करायला हवा असे त्यांनी जाता जाता नमूद केले.
प्राचार्य वेंगुर्लेकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य नावेलकर यांनी मुंबईत रामाणीची झालेली भेटीची आठवण सांगून,ते म्हणाले, प्रगल्भता वाढविण्यासाठी मी काही प्रथितयश कवींच्या कविता वाचल्या. स्वतंत्र विचाराने एखादे चित्र आपण साकारतो तेव्हा ते जास्त चांगले उतरते. यावेळी प्रदर्शनाच्या माहिती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवर पाहुणे आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले रामाणी यांचे पुतणे हेमंत रामाणी, रामाणी जन्मशताब्दी समितीचे कार्यवाह डॉ. नितीन बोरकर, दै. तरुण भारतचे गोवा संपादक सागर जावडेकर, कवयित्री राधा भावे, प्रसिद्ध पोर्ट्र?ट आर्टिस्ट संजय हरमलकर यांचा सौ. शलाका नाईक व उर्वी नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. चित्रकारांच्या वतीने दिलेश हजारे यांनी मनोगत व्यक्त केले. नितीन कोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले. नागेशराव सरदेसाई यांनी आभार मानले.