तीन वहानांचे नुकसान
वारणानगर/ प्रतिनिधी
कोल्हापूर – रत्नागिरी राज्य मार्गावर पैजारवाडी ता. पन्हाळा येथे कोल्हापूरकडे येणाऱ्या भरधाव ट्रक चालकाचा वेगावरील ताबा सुटल्याने रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून धडक दिल्याने यामध्ये बसचालकासह सहा प्रवाशी जखमी झाले असून बसला मागून धडक दिल्याने स्वीप्ट कार, एसटी व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पैजारवाडी येथे सकाळी ११ वा. झालेल्या आपघाताची फिर्याद पांडुरंग दत्तु कांबळे (रा.कापशी ता.शाहुवाडी) याने कोडोली पोलिसात दिल्यावर ट्रकचालक अशोक शंकर तांदळे (रा .कळंबा) कोल्हापूर याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आपघातात एस.टी. चालक प्रकाश गोविंद पाटील, एस.टी. तील प्रवाशी लाखन भिमाप्पा मियानावार (रा. उगस्ती ता . बैलहोंगल, बेळगांव), सय्यद शफी मुल्ला (रा. शिकारीपाडा, बेंगळूर), रेहान इमामनगर (रा. बेळगांव) , संभाजी शंकर कुंभार, शुभांगी संभाजी कुंभार, बेबी शंकर कुंभार (सर्व रा . तळेगाववाडी,पनवेल ता.खालापूर जिल्हा रायगड) व एसटीतील इतर प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.कोडोली पोलीस या आपघाताचा तपास करीत आहेत.