उदय सावंत/वाळपई
आजपासून नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने आपण देवी दुर्गेची प्रार्थना करतो, उपासना करतो. देवीची 9 दिवसातली नऊ रुपे आपणा सर्वांना प्रेरणा देत असतात. आधुनिक काळात आपण सर्वच महिलांना देवीच्या रुपात पाहतो. सामाजातील विविध स्तरावर अत्यंत कबाड कष्ट करुन अनेक प्रसंगांना समर्थपणे तोंड देणाऱया महिला या देखील आधुनिक दुर्गाच आहेत. दैनिक ‘तरुण भारत’ अशा दुर्गांचा परिचय दररोज या ठिकाणी करुन देणार आहे. आजपासून या दुर्गा मातांना आम्ही वंदन करीत आहोत. आपल्या आसपासच्या परिसरात अशाच धैर्यशाली, संघर्षाला सामोरे जाणाऱया, शुन्यातून विश्व निर्माण करणाऱया दुर्गा मातांना या सदरात आणायच्या असतील तर दैनिक ‘तरुण भारत’शी आवश्य संपर्क साधा.
आजपासून नवरात्रोत्सव उत्सवाला सुरुवात होणार आहे .यामुळे सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये संघर्षाला तोंड देऊन व्यवसाय उभा करणाऱया नवदुर्गेचा सन्मान करण्याचे कार्य सुरू होणार आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आपला विकास करीत असतात. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपली विशिष्ट अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न महिला भगिनी करीत असतात. अनेक महिलांना यामध्ये यश येते तर अनेक महिला अपयशाने खचून जातात. मात्र काही महिला अपयश आले असताना सुद्धा अपयशावर मात करून नव्या उत्साहाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचा धाडसाने प्रयत्न करीत असतात .अशा महिला निश्चितच प्रयत्नतून नवा अध्याय निर्माण करीत असतात .
सत्तरी तालुक्मयाच्या पिसुर्ले भागातील सौ.हीतेश्री हनुमंत परब या अशाच एक महिला ज्याने स्वयरोगाच्या माध्यमातून समाजामध्ये आपली कणखर महिला म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना चांगल्या प्रकारचे यश प्राप्त होताना दिसत आहे.
सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले भाग गेल्या अनेक वर्षापासून खाणीच्या साम्राज्यामध्ये बरबटलेला आहे. पारंपारिक कृषी परंपरा या भागातून जवळपास नष्ट झालेली आहे. खाणीच्या माखलेल्या जीवनामध्ये मरगळलेली मनावस्था यामुळे आजही अनेक कुटुंबे उदारनिर्वाहाचा नवा मार्ग शोधताना दिसत आहेत.अनेक महिलांना हा मार्ग सापडलेला नाही. मात्र हितेश्री हनुमंत परब हिला स्वयंरोजगाराचा नवा मार्ग सापडला असून गेल्या दोन वर्षापासून या मार्गावर अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देत स्वयरोजगाराचा नवा मुकुट तयार करण्याच्या प्रयत्नाला लागलेली आहे. त्याला चांगल्या प्रकारचे यश येत आहे.
चांगल्या प्रकारचे घरगुती पापड तयार करून ते मार्केटमध्ये विक्री करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. त्यांच्या पापडांना विशेष अशी मागणी आहे. गावठी मिरी, लसूण, मिर्ची अशा वेगवेगळय़ा रूचीमध्ये बनविलेले पापड हे अनेक ठिकाणी हातोहात खपतात हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. गेल्या दोन वर्षापासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून तिला चांगल्या प्रकारे यश येत असल्यामुळे अन्य दोन महिलांना त्यांनी सोबत घेऊन आपल्या धंद्याचा विस्तार करण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू केलेले आहेत. या दोन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वी ठरलेली आहे.
मनामध्ये इच्छा असली की कोणतेही गोष्ट अवघड वाटत नाही. कणखर व जिद्दी महिला कारणे सांगत नाही तर कारणावर मात करून चिकाटीने पुढे जात असतात .याच्याच पैकी हितेश्री श्री हनुमंत परब या महिला आहेत.
हनुमान परब हे समाजकार्यामध्ये गुंतलेले आहेत. मात्र आपल्या अंगामध्ये असलेली कला ही विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून येथे सौ. परब यांनी आपल्या नवऱयाची समजूत घातली व त्यांनी हा नवा अध्याय सुरू केलेला आहे.
खनिज खाणींचे व्यवसाय बंद झाल्यानंतर दारामध्ये उभे असलेले लाखो रुपयांचे ट्रक यामुळे अनेकांची आज आर्थिक परिस्थिती मोडकळी झालेली आहे. मात्र मोडकळीस आलेल्या परिस्थिती समोर गुडघे न ठेवता हीतेश्री हनुमंत परब यांनी आपल्या पत्नीच्या जिद्दीसाठी ट्रक विकून भांडवल तयार केले व त्याच्यातून हा व्यवसाय सुरू झालेला आहे. पापड निर्मितीसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री त्यांनी आपल्या पत्नीसाठी उपलब्ध करून दिली व आज त्या चांगल्या प्रकारचा पापड व्यवसाय करताना दिसत आहेत.
“नाथ” पापड यांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत वाळपई येथील गोवा बागायतदार ,सत्तरी बाजार, वाळपई सुपर मार्केट, येथील अनेक दुकाने साखळी येथील गोवा बागायतदार डिचोली गोवा बागायतदार ,फोंडा गोवा बागायतदार अशा विविध दुकानामध्ये त्यांचे पापड हे हातोहात खपतात. “नाथ” पापडांची एक चवच वेगळी असते .यामुळे दोन वर्षांमध्ये हा पापड सध्यातरी मार्केटमध्ये विशिष्ट अशी ओळख निर्माण करण्यास यशस्वी ठरलेला आहे.
पापड या व्यवसायातून मोठा फायदा नसला तरीसुद्धा आपल्या हातून निर्माण झालेले पापड हे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे विक्री जातात यांच्यापेक्षा मनाला वाटणारा दुसरा आनंदच असू शकत नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया हीतेश्री हनुमंत परब या व्यक्त करतात. आपण फक्त लिज्जत पापडाचे नाव घेतो मात्र त्याच्या पलीकडे जाऊन गावठी पापड हे चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये आपले स्थान कशाप्रकारे निर्माण करू शकतो याचे चांगले उदाहरण म्हणजे परब यांच्या हातून निर्माण झालेला नाथ हा पापड आहे.
आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. याचा आनंद आहेच मात्र ज्या महिलांच्या अंगामध्ये विविध कला भरलेली आहे. त्यांना कष्टाचे बळ निर्माण झाल्यास सत्तरी तालुक्मयातील किंवा ग्रामीण भागातील महिला सुद्धा एक चांगल्या प्रकारच्या व्यवसायिक बनू शकतात अशी प्रतिक्रिया त्या व्यक्त करतात.
आपण एक ग्रामीण भागातील महिला असून सुद्धा आपले पती हनुमंत परब यांनी सातत्याने आपल्याला प्रोत्साहन दिले आहे. यामुळेच आपण खऱयार्थाने आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी ठरत असल्याचे त्या मुद्दामपणे सांगतात.
स्वतःचे घर मुलं सांभाळून ते आपल्या व्यवसाय करतात. आपल्या व्यवसायामध्ये दोन महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांच्या या व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. आज अशा प्रकारची व्यवस्था तयार होणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक महिलेच्या हाती स्वयंरोजगाराची दोरी येणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा ग्रामीण भागातील जनता ही विकासाच्या पलीकडे जाऊ शकत नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया हितेश श्री परब व्यक्त करतात.