मंत्री रोहन खवटे , बेरोजगाराची समस्य सोडाविण्यासाठी होणार मदत
प्रतिनिधी /पेडणे
तुये इलेक्ट्रॉनिक सिटी नवीन प्रकल्पांना चालना देताना दोन वर्षाच्या आत याठिकाणी विविध प्रकल्प उभारून त्या ठिकाणी जे रोजगार निर्माण होणार आहे त्यांच्यासाठी पूर्वनियोजित प्रशिक्षण देण्याची सोय केली जाईल, असे आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितले .
आयटी मंत्री रोहन खंवटे आणि मांदे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या सोबत सोमवारी 18 रोजी तुये येथे होऊ घातलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सिटी प्रकल्प आणि परिसराला भेट देऊन अधिकाऱयांकडून प्रकल्पाबाबत आढवा आणि अधिक माहिती जाणून घेतली.
तुये पंचायत क्षेत्रातील सरकारी जागेत इलेक्ट्रॉनिक सिटी हा बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी, ज्या शेतकऱयांसाठी सरकारने साडेपाच लाख चौरस मीटर जागा लीजवर दिली होती, ती जागा सरकारने आपल्या ताब्यात घेऊन या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक सिटी उभारण्याचा प्रयत्न केला होता.आणि या प्रकल्पात विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प उभारून बेरोजगारी हटवण्याचा ही प्रयत्न केला होता. परंतु मागच्या पाच वर्षात या प्रकल्पात एकही प्रकल्प उभा राहू शकला नाही. केवळ रस्त्याचे जाळे विणण्यात आले आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक सिटी ते राष्ट्रीय महामार्ग 66 धारगळ पर्यंत जोड रस्ता अजूनही तयार न केल्याने मोठी यंत्रणा या ठिकाणी पोचू शकत नसल्याने या ठिकाणी आयटीपी इलेक्ट्रॉनिक सिटीत वेगवेगळे प्रकल्प उभारण्यास अडचणी येत आहेत.
यासंदर्भात आयटी मंत्री रोहन खंवटे आणि आमदार जीत आरोलकर यांनी पूर्ण परिसराची पाहणी केली. या भागात कोण कोणते प्रकल्प येणार आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन येथील जे रोजगार उपलब्ध होणार आहे ते रोजगार स्थानिकांना मिळवून देण्यात प्रयत्न केला जाईल असे यावेळी मंञी रोहन खंवटे आणि आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.
यावेळी मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की या प्रकल्पात बहुउद्देशीय प्रकल्प आणत असताना मोबाईलचे स्पेअर पार्ट किंवा इलेक्ट्रॉनिक्स मशिनरी द्वारे इलेक्ट्रॉनिक मशीन साठी लागणारे स्पेअर पार्ट किंवा इतर चांगले प्रकल्प या इलेक्ट्रॉनिक सिटी यावे म्हणून आमचे सरकार प्रयत्न करणार आहेत .आणि त्याविषयी आपण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
स्थानिक पत्रकारांनी यावेळी मंत्री रोहन खोटे यांना विचारताना मागच्या सरकारात तुम्ही दोन वर्षासाठी मंत्री म्हणून होतात. त्यावेळी कामाला गती का दिली नाही त्यावर मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले त्यावेळी आपण एकदा याठिकाणी भेट दिली होती आणि त्या काळात आमदार दयानंद सोपटे हेही उपस्थित होते. परंतु योग्य पद्धतीने पाठपुरावा न झाल्याने आणि आपण मंत्रिमंडळातून वजा झाल्यामुळे या प्रकल्पाला आवश्यक तो पाठपुरावा न झाल्याचे त्यांनी मान्य केले.
मंत्री रोहन खंवटे यांनी पुढे बोलताना सांगितले की झाले गेले आता विसरून जाऊ या आणि नव्याने पुन्हा जरी एखाद्या आमदाराला किंवा मंत्र्याला पाच वर्षासाठी सरकार किंवा मंत्री निवडून देतो त्यावेळी त्यांना काम करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे. परंतु आमचा कार्यकाळ पाच वर्षाचा असला तरी सुद्धा दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक्स सिटीचे काम पूर्ण करून त्या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प उभारणे या बरोबरच बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील असे रोहन खंवटे यांनी सांगितले.
स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी बोलताना मंत्री रोहन खवटे हे आपले मित्र आहेत आणि सरकारात ते मंत्री असल्याने आणि आपला मगो पक्ष ही सरकारात सामील झाल्यामुळे दोन्ही पक्ष हातात हात घालून विकासाला चालना देणार आहे. शिवाय ” मतदार संघातील बेरोजगारी हटवण्यासाठी या इलेक्ट्रॉनिक सिटी मध्ये वेगवेगळे प्रकल्प यावेत यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. शिवाय पर्यटन दृष्टय़ा आपला मतदार संघ महत्त्वाचा मानला जात असल्याने पर्यटनाच्या नजरेतुनही विकासाची दालने उघडण्यासाठी सरकारचे सहकार्य घेऊन बेरोजगारी हटवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
इलेक्ट्र?निक सिटी मध्ये वेगवेगळे प्रकल्प येत असल्यामुळे त्या पूर्वी या ठिकाणी उपविभागीय वीज केंद्र पाणी प्रकल्प हे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले जाणार आहे असेही मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
ड़ नुकसान भरपाई विषयी
यावेळी पत्रकारांनी ज्या शेतकऱयांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या त्यांना कोणत्या प्रकारची नुकसानी दिली जाईल असे विचारले असता,ही जागा सरकारची आल्वारा जमीन होती ती लीज द्वारे शेतकऱयांना दिली होती ती जागा सरकारने आपली परत घेतली आहे .मागच्या सरकारने कोणता तोडगा काढला असेल ते पहावे असे त्यांनी सांगितले.