साहित्यानी म्हापसा बाजारपेठ फुलली
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यात मोठी दिवाळी (व्हडली दिवाळी) आज शनिवार दि. 5 रोजी साजरी होणार असून या दिवाळीनिमित्त घरोघरी तुळशी विवाह करण्यात येतो. याचे औचित्य साधून घरोघरी तुळशी रंगविण्याच्या कामात गती आली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. राज्यात देव दिवाळीची तयारी जोरात सुरू झाली आहे. देव दिवाळीत तुळशी विवाह लावण्याची पथा आहे त्याची तयारी घराघरांत सुरू झाली आहे. घरासमोरच्या तुळशी वृंदावनांना नवा साज चढू लागला आहे. आज शनिवारी देव दिवाळीला सुरवात होत असून अनेक घरांत तुळशी विवाह लावले जातील. तसे कार्तिक एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावले जातात.
तुळशी विवाहानंतर लग्न कार्य सुरू होते
देव दिवाळीला गोव्यात व्होडली दिवाळी म्हणतात. तुळशी विवाहालाही गोव्यात खास असे महत्त्व आहे. बहुतांश घरांत कार्तिक एकादशीलाच तुळशी विवाह लावण्याची प्रथा आहे. हिंदू रीती परंपरेनुसार तुळशी विवाह लावल्यानंतर घरातील लग्नकार्य लावता येतात. तुळशी विवाह हा श्री विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव होय. तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुळशी विवाहाचीही खास तयारी केली जाते. तुळसी वृंदावनाची रंगरंगोटी, सजावट यावर भर दिला जातो. तसेच तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य जमवणे यासाठी धावपळ केली जाते. तुळशी विवाहासाठी ऊस, चिंच, आवळा, दिंडा, आदींची गरज असते. तसेच फराळ म्हणून पोहे, चिरमुले, आदी वाटले जातात. सध्याचे माणसाचे जीवन हे धावपळीचे झाल्याने बहुतेक वस्तू बाजारातून खरेदी करून आणण्यावर लोकांचा भर असतो. सध्या बाजारातया वस्तू मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्या आहे आणि खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. म्हापसा बाजारपेठ सध्या तुळशी विवाहासाठी लागणाऱया साहित्याने सजलेली दिसत आहे.
जोडवी उजळण्याची प्रथा
गोव्यात तुळशी विवाहाची सुरुवात दोन-तीन दिवस आधीच होते. विशेषतः महिलावर्ग दशमीपासून तीन दिवस उपवास पाळतात. दशमी दिवशी नदीकाठी वा विहिरीकाठी दगडांची पूजा करुन श्री विष्णूची आराधना केली जाते. अनेक महिला एकत्र येऊन ही पूजा करतात. काल राज्यातील अनेक महिलांनी हे वृत्त मनोभावे केले. दुसऱया दिवशीही उपवास केला जातो आणि तिसऱया दिवशी कार्तिक एकादशीचा उपवास पाळून तुळशी विवाह लावल्यानंतर तुळशी वृंदावनासमोर जोडवी उजळून नंतर उपवास सोडला जातो. त्यामुळे तुळशी विवाह हा महिलांसाठी खास असतो.
बाजारपेठेत चिरमुऱया आल्या आहेत. चिरमुऱया 80 ते 100 रुपये प्रति दराने विकल्या जात आहेत. तुळशी वृंदावन रंगकाम करणाऱया रंगामध्येही 15 ते 20 रुपयाने यंदा वाढ झाली असल्याची माहिती डिचोली येथील नितिक्षा गांवकर यांनी सांगितले. घरोघरी गावागावात तुळशी वृंदावन रंगकाम सुरू आहे. घरात साफसफाईही करण्यात येत आहे. गेल्यावर्षी कोविड आणि वरुण राजाचे सावट होते मात्र यंदा त्यांचा कृपाशीर्वाद लाभो असे काहींचे म्हणणे आहे. बार्देशात काही ठिकाणी सार्वजनिक तुळशी विवाह साजरा केला जातो.
नवऱयाला मोठय़ा प्रमाणात मागणी आणि हातोहाथ संपले
उसप येथील एका महिलेने दिंडय़ा पासून तुळशी विवाहाला लागणारे दिंडय़ाच्या काढय़ा सजवून विक्रीस आणल्या होत्या. त्या 20 ते 30 रुपये प्रती एक अशा दराने बाजारपेठेत विकल्या गेल्या. काही विक्रेत्यांनी त्या महाराष्ट्रातील महिलांकडून 20 रुपया दरात विकत घेऊन नंतर स्वतः 50 रुपये प्रती एक असे विकल्या. हे नवऱयासाठी नक्षीकाम करण्यासाठी आम्हाला चार दिवसांचा अवधी लागला असल्याची माहिती भागीरीथी गुरव यांनी या प्रतिनिधीला बोलताना दिली. बाजारपेठेत उसही मोठय़ा प्रमाणात विकला गेला. शुक्रवार हा म्हापशाचा बाजार असल्याने दिवाळीचे सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केल्याचे पहायला मिळाले. विवाहाचे सामान आणि चिरमुऱयाही बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध होत्या.