कोकण बोर्ड 97.21 टक्केवारी मिळवत सलग 11 व्या वर्षी प्रथम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणच्या विद्यार्थ्यांनी सलग 11व्या वर्षीही बारावीच्या परीक्षेत आपल्या गुणवत्तेच्या जोरावर राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ-पुणेतर्फे घेण्यात येणाऱया उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीचा ऑनलाईन निकाल 8 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. राज्यात बारावीत कोकण विभागीय मंडळाने 97.21 टक्केवारी मिळवत यंदा सलग 11 वर्षीही राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याची माहिती कोकण मंडळाचे प्र. विभागीय अध्यक्ष देवीदास कुलाळ यांनी दिली.
यंदाही मुलींनी 97.94 टक्केवारी प्राप्त करत बाजी मारली आहे. कोकणच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश निर्विवाद आहे. कोकण विभागात रत्नागिरीचा निकाल 96.39 टक्के तर सिंधुदुर्ग जिह्याचा 98.75 टक्के लागला आहे. 2019 मध्ये कोकण विभागाची 1.62 टक्के निकालात घट झाली होती. पण 2020 मध्ये त्यात 2.66 टक्के वाढ झाल्याने घट भरून निघाली होती. 2020 मध्ये कोकण विभाग निकालात 93.23 टक्के इतकी वाढ झाली होती. तर गतवर्षी 2021 मध्ये यामध्ये आणखीन वाढ होत 93.92 टक्के आलेख उंचावला होता. पण यावर्षी 2022 मध्ये कोकण विभागाचा निकाल 97.21 टक्के इतका राज्यात अव्वल लागला असला तरी गतवर्षाचा कोकण बोर्ड निकाल 99.81 टक्के होता त्यात 2.6 टक्क्यांनी घट झाली आहे.
कोकण विभागाच्या शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा 98.93 टक्के, कला शाखेचा 94.37 टक्के, वाणिज्य 97.47 टक्के, तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल 98.08 टक्के आणि टेक्निकल सायन्स शाखेचा निकाल 72 टक्के इतका लागला आहे.
यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातून एकूण 29,413 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 28,595 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात विज्ञान शाखेसाठी 9098 प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 9001 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी 6774 इतक्या प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 6393 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेसाठी 12,260 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 11,951 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रविष्ट असलेल्या 1256 पैकी 1232 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर टेक्निकल सायन्सच्या प्रविष्ट 25 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्य़ात या परीक्षेसाठी एकूण 19,183 नोंद विद्यार्थ्यांपैकी 19091 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली व त्यामधून 18,402 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरी जिह्याचा 96.39 टक्के निकाल लागला. तर सिंधुदुर्ग जिह्यातून 10357 नोंदलेल्या विद्यार्थ्यांपैकी 10,322 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यापैकी 10,193 विद्यार्थी उत्तीर्ण होत सिंधुदुर्ग जिह्याने 98.75 टक्केवारी प्राप्त केली आहे.
रत्नागिरी जिह्यातून विज्ञान शाखेत 5975 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 5887 (98.52 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी 4661 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 4343 (93.17 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत 7979 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 7709 विद्यार्थी (96.61 टक्के) उत्तीर्ण झाले. तर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 463 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 457 विद्यार्थी (98.70टक्के) उत्तीर्ण झाले. तसेच टेक्निकल सायन्सच्या 13 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी (46.15 टक्के) उत्तीर्ण झाले. तर सिंधुदुर्ग जिह्यातून विज्ञान शाखेसाठी 3123 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 3,114 (99.71 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी 2113 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 2050 विद्यार्थी (97.01 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच वाणिज्य शाखेसाठी 4281 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 4242 (99.08 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमातून 793 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 775 विद्यार्थी (97.73 टक्के) यशस्वी झाले. तर टेक्निकल सायन्समध्ये 12 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी (100 टक्पे) उत्तीर्ण झाले. तसेच यावर्षी कोकण बोर्डात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ातून पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांत 422 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 262 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल 62.08 टक्के लागला आहे. या पत्रकार परिषदेला बोर्डाच्या विभागीय सचिव भावना राजनोर आदी अधिकारी यांची उपस्थिती होती.
निकालात अद्यापपर्यंत अव्वल!
2012 साली कोल्हापूर केंद्रातून स्वतंत्र करण्यात आलेल्या कोकण विभागीय मंडळाने 2012 साली कोकण विभागाने 86.25 टक्के, 2013 साली 85.88 टक्के, 2014 साली 94.85 टक्के, 2015 साली 95.68 टक्के, 2016 साली 93.29 टक्के, 2017 साली 95.20 टक्के, तर यंदा 2018 साली 94.85 टक्के, 2019 मध्ये 93.23 टक्के आणि आता 2020 मध्ये 95.89 टक्के प्राप्त करत राज्यात अव्वल टक्केवारी प्राप्त केली होती. मात्र 2021 मध्ये या निकालात 99.81 टक्के इतकी वाढ झाली होती. यावर्षी 2022 मध्ये हा निकाल 97.21 टक्के इतका लागला आहे. जरी या निकालात चढ-उतार होत असला तरी कोकण बोर्ड राज्यात निकालात अव्वल येत सलग 11 वर्ष राखलेले सातत्य हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह त्यांचे शिक्षक, पालकांचेही योगदान महत्वपूर्ण आहे.
मुलांपेक्षा मुलींचीच सरशी
कोकण विभागात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी कोकण विभागातून एकूण 14,888 प्रविष्ट मुलांपैकी 14,369 मुलगे (96.51 टक्के) उत्तीर्ण झाले. तर परीक्षेला एकूण 14,525 प्रविष्ट मुलींपैकी 14,226 मुली (97.94 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे मुलांपेक्षा अधिक टक्केवारी मिळवत यावर्षी 2022 मध्येही मुलींनीच यशस्वीतेत बाजी मारली आहे.
यशाचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांचे
12 वी परीक्षेतील यशाचे सर्व श्रेय हे विद्यार्थ्यांनाच द्यायला पाहिजे. शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यांनेच विद्यार्थ्यांची मेहनत फळाला आली आहे. येथील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांची काम करण्याची नियोजनबध्द पध्दत यामुळे निकाल अव्वल ठरत आहे. त्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱयांचीही मेहनत महत्वाची आहे. या निकालात असलेले सातत्य हे भविष्यातही टिकवून ठेवण्याची जबाबदारी कोकण बोर्डाची वाढली असून निश्चितच प्रयत्न राहतील.