जिल्हय़ात 90 केंद्रांवर 51 हजार 853 परीक्षार्थी : परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी काटेकोर नियोजन
प्रतिनिधी /बेळगाव
बारावीच्या वार्षिक परीक्षांना शुक्रवार दि. 22 पासून सुरुवात होत आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. परंतु, यावषी कोरोनाचे संकट काहीसे दूर झाल्याने पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय पदवीपूर्व विभागाने घेतला आहे. बेळगाव जिल्हय़ातील एकूण 90 परीक्षा केंद्रांवर 51 हजार 853 परीक्षार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने कंबर कसली असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
यावषी 22 एप्रिल ते 18 मे या दरम्यान बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. परंतु, यावषी नियमित पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यावषी जे विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत, त्यांनी आपली दहावीची परीक्षाही नियमितच दिली होती.
मागील काही वर्षांचा बेळगाव जिल्हय़ाचा निकाल पाहता तो सुधारणे आवश्यक आहे. बेळगावपेक्षा चिकोडी शैक्षणिक जिल्हा दहावीबरोबरच बारावीतही सरस ठरत आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेमध्ये चिकोडी शैक्षणिक जिल्हा 60.89 टक्क्मयांसह राज्यात 25 व्या क्रमांकावर होता तर 56.18 टक्क्मयांसह बेळगाव शैक्षणिक जिल्हा 28 व्या स्थानावर होता. 2019-20 या शैक्षणिक वर्षात निकालात काहीशी सुधारणा पहावयास मिळाली. 63.88 टक्क्मयांसह चिकोडी जिल्हा 20 व्या स्थानी तर 59.07 टक्क्मयांसह बेळगाव जिल्हा 27 व्या स्थानी पोहोचला होता.
त्यानंतरच्या काळात मात्र परीक्षाच झाल्या नसल्याने गुणवत्तेतील सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात तरी बेळगाव जिल्हय़ाच्या गुणवत्तेत सुधारणा होते का? हे पहावे लागणार आहे.
परीक्षा केंद्रांमध्ये वाढ
बेळगाव जिल्हय़ात यावेळी एकूण 90 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. यातील बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील 42 तर चिकोडीतील 48 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. गतवषी 85 केंद्रांवर परीक्षा झाली होती. यावषी बेळगाव शहरात 2, रामदुर्ग येथे 2 तर शिरगुप्पी येथे 1 अशा पाच नव्या केंद्रांची भर पडली आहे.
जुन्या प्रश्नपत्रिकांचा विद्यार्थ्यांकडून सराव
बारावीची परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी पदवीपूर्व विभागाने सर्व त्या उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचे संकट कमी असले तरी विद्यार्थ्यांची योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. मागील दोन वर्षात परीक्षा नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून करण्यात आला आहे. जुन्या प्रश्नपत्रिकांचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला असून दोन सराव परीक्षाही घेतल्या गेल्याची माहिती पदवीपूर्व विभागाचे उपसंचालक व्ही. नागराज यांनी दिली.
20 हजार 817 नियमित विद्यार्थी
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात यावषी 20 हजार 817 नियमित विद्यार्थी आहेत. 2 हजार 829 रिपीटर असणार आहेत. यामध्ये 12 हजार 697 विद्यार्थी तर 11 हजार 349 विद्यार्थिनींचा समावेश आहे. कला शाखेसाठी 10 हजार 149, वाणिज्य शाखेसाठी 7 हजार 976 तर विज्ञान शाखेसाठी 5 हजार 921 विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती पदवीपूर्व खात्याने दिली आहे.
परीक्षा केंद्रांवर राहणार सीसीटीव्हीची नजर
बारावीच्या परीक्षेवेळी होणारी कॉपी टाळण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने कडक उपाययोजना आखल्या आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीच्या कॅमेऱयांची नजर राहणार आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही आहेत, अशाच केंद्रांची निवड करण्यात आली आहे. खाजगी कॉलेजसोबत सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आल्याचे पदवीपूर्व विभागाने कळविले आहे.