पटना ः
बिहारमध्ये शनिवारी झालेल्या दोन मोठय़ा अपघातांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्णिया येथील बियासी उपविभागात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. एक समारंभ आटपून सर्व लोक ताराबारीहून किशनगंजच्या नुनिया या त्यांच्या गावी परतत होते, तेव्हा वळणावर स्कॉर्पिओ थेट तलावात कोसळली. यादरम्यान वाहनातील 11 जणांपैकी 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातात चालकाचाही मृत्यू झाला आहे. मरण पावलेले सर्व नातलग असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पाटणा येथील दानापूर येथे भरधाव टँकरने तीन तरुणांना चिरडले. या अपघातात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.