भागशिक्षणधिकाऱयांना पालकांकडून निवेदन सादर : मुलांना खासगी शाळांमध्ये दाखल करण्याचा इशारा
प्रतिनिधी /वाळपई
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार गोव्यातील अनेक प्राथमिक शाळा स्थलांतरित करण्यात येणार आहेत. तशा हालचाली सुरू झाल्या असून सत्तरी तालुक्मयातील बाराजण येथील प्राथमिक शाळा खडकी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. याला स्थानिकांनी तीव्र विरोध केलेला आहे. तसे झाल्यास मुलांना खासगी शाळांमध्ये पाठविण्याचा इशारा पालकांनी दिलेला आहे.
दरम्यान, याबाबतचे निवेदन ग्रामस्थांतर्फे वाळपई भाग शिक्षणाधिकाऱयांना सादर करण्यात आले. यावेळी पालकांनी शाळेची परिस्थिती व शाळा स्थलांतरित केल्यास होणाऱया पारिणांमांबाबत सविस्तर चर्चा केली.
खोतोडा पंचायत क्षेत्रातील बाराजण येथील प्राथमिक शाळेत बाराजण व पाटवळ या दोन्ही गावातील एकूण 31 मुले शिक्षण घेत आहेत. मात्र सरकारने नीती आयोगानुसार बाराजण शाळा बंद करून सदर मुलांना खडकी याठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र याला ग्रामस्थांनी व पालकांनी तीव्र विरोध केलेला आहे. ही शाळा खडकी या ठिकाणी स्थलांतरित केल्यास पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे त्यांनी आज वाळपई भागशिक्षणाधिकारी श्रीरंग बर्वे व भालचंद्र भावे यांना निवेदन सादर करून आपला विरोध दर्शविला.
नीती आयोगाच्या शिफारसीनुसार गोव्यातील अनेक शाळा स्थालांतरित होणार आहेत. बाराजण येथील शाळा खडकी येथे स्थलांतरित केल्यास त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार, अशी माहिती यावेळी भागशिक्षणाधिकारी श्रीरंग बर्वे यांनी दिली. पालकांचे सदर निवेदन सरकारला पाठविण्यात येईल, त्यानंतर सरकारच्या निर्णयानुसारच पुढील प्रक्रिया होणार असल्याचे भागशिक्षणधिकारी भालचंद्र भावे यांनी स्पष्ट केले.
बाराजण शाळा सर्वच दृष्टीने सोयिस्कर
बाराजण शाळा गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत असून सदर शाळा मध्यवर्ती ठिकाणी आहे. यामुळे सोयिस्कर आहे. या गावातील जास्त पालक हे रोजंदारीवर कामाला जात असतात. सदर शाळा बंद करून खडकी येथे मुलांना स्थलांतरित केल्यास पालकांची गैरसोय होऊन मुलांना तेथे पोहोचविणे शक्मय होणार नाही, असे यावेळी पालकांनी स्पष्ट केले. ही शाळा खडकी येथे शाळा स्थलांतरित झाल्यास पाटवळ गावातील मुलांना सुमारे 5 किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. यामुळे मुलांचे हाल होणार आहे.
चाळीस वर्षे सरकार कुठे झोपले होते
40 वर्षे ज्या शाळेमध्ये सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत त्या आताच कशा काय उपलब्ध होणार असा सवाल केला. आतापर्यंत सरकारची यंत्रणा झोपली होती का असा संतप्त सवाल पालकांनी यावेळी केला
मुख्यमंत्री, स्थानिक आमदारांना निवेदन देणार
मुख्यमंत्री प्रमोद सावंत व स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेऊन आमच्या भावना निवेदनाद्वारे कळविणार. त्यांना आमचा शाळे स्थलांतणास तीव्र विरोध असल्याचे सांगणार, असे यावेळी पालकांनी सांगितले.