राज्यात गतवषीपेक्षा 37 टीएमसी अधिक पाणीसाठा : नैसर्गिक आपत्ती नियंत्रण केंद्राची माहिती
प्रतिनिधी /चिकोडी
राज्यातील मोठय़ा जलाशयामध्ये गतवर्षीपेक्षा 43 टीएमसी अधिक पाणीसाठा शिल्लक ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुरेसा पाऊस पडत असला तरी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी जलाशयात गतवषीपेक्षा अधिक पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. आलमट्टीमध्ये गतवषीपेक्षा दुप्पट पाणीसाठा शिल्लक ठेवण्यात आला आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण केंद्राच्या माहितीनुसार राज्यातील 13 मोठय़ा जलाशयांमध्ये गतवषीपेक्षा अधिक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक ठेवण्यात आला आहे. 30 मे अखेर राज्यातील 13 जलाशयात 860.27 टीएमसी पाणीसाठय़ाची क्षमता असून मे 2022 अखेर या जलाशयामध्ये अद्यापही 282.58 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. 2021 अखेर हा पाणीसाठा 245.90 टीएमसी इतका होता. गतवषीच्या तुलनेत यंदा 43 टीएमसी अधिक पाण्याचा साठा राखून ठेवण्यात आला आहे.
गतवषी 30 मे अखेर 18 हजार 704 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर यंदा विसर्गाचे प्रमाण थोडेसे कमी करण्यात आले असून 15 हजार 147 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण राज्यभरात चांगले राहिले असले तरी ऐनवेळी दुष्काळ पडण्याची शक्मयता असल्याने नैसर्गिक आपत्ती नियंत्रण केंद्राच्या नेतृत्वाखाली राज्यात दुष्काळी संकट उद्भवू नये, पिण्यासाठी तरी किमान पाण्याची सोय व्हावी, यासाठी जलाशयांमध्ये अधिक प्रमाणात पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय गेल्या पावसाळय़ानंतरही बराच काळ मध्यंतरी पाऊस झाल्याने यंदा जलाशयांमध्ये अधिक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
केआरएस जलाशयात 38.04 मीटर पाणीसाठवण पातळी असून गतवषी 26.58 मीटर अशी पाणीपातळी होती. यंदा ही पातळी 31.99 अशी आहे. 49.45 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या जलाशयात गतवषी 14.34 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तर यंदा 26.95 म्हणजेच एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 55 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवषीच्या तुलनेत यंदा 15 टीएमसी पाण्याचा अधिक साठा करण्यात आला आहे. कबिनी जलाशयात 696.13 मीटर पाणी साठवण क्षमता पातळी असून सध्या ही पाणीपातळी 689.66 मीटर आहे. गतवषी पातळी 690.13 इतकी होती. 19.52 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या जलाशयात गतवषी याच काळात 9.07 टीएमसी तर यंदा 8.41 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण साठवण क्षमतेच्या 43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कावेरी तटावरील जलाशयात एकूण साठवण क्षमतेच्या 56 टक्के पाणीसाठा शिल्लक ठेवण्यात आला आहे.कृष्णा किनाऱयावरील भद्रा जलाशयाची पाणीसाठवण पातळी 657.73 मीटर असून यावषी 646.91 मीटर अशी पातळी आहे. तर गतवषी ही पातळी 643.22 इतकी होती. 71.54 टीएमसी पाणीसाठा असलेल्या जलाशयात गतवषी याच काळात 25.82 टीएमसी तर सध्या 34.71 टीएमसी म्हणजेच गतवषीपेक्षा 8 टीएमसी अधिक पाणीसाठा ठेवण्यात आला आहे.