चरावयास सोडल्यानंतर उंब्रापाणी जंगलातील घटना
वार्ताहर/नंदगड
खानापूर तालुक्याच्या नागरगाळी भागातील उंब्रापाणी परिसरातील जंगलात वाघाकडून दोन म्हशींवर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामध्ये दोन म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. यामध्ये सोनाबाई मधू पाटील यांचे सुमारे 90 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. नागरगाळी-दांडेली रस्त्या दरम्यानच्या उंब्रापाणी गावच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. जंगल परिसरात वाघ व अन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. नेहमीप्रमाणे या भागातील लोक जनावरे घेऊन जंगलात जातात. मंगळवारी दुपारी त्यांनी आपली गुरे सोडली होती. नाल्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी जनावरे गेली असताना वाघाने त्यांच्यावर झडप घातली. दरम्यान गुराखी वाघाची डरकाळी ऐकून गावाकडे पळून आले. तोपर्यंत वाघाने म्हशींचा फडशा पाडला.
पाळीव प्राण्यांवर नेहमीच हल्ले
घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.