बेळगाव : मतदारयादीत नावे नोंदविण्यासाठी मंगळवार दि. 11 एप्रिलपर्यंत मुदत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. नागरिकांनी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (एनव्हीएसपी) मध्ये लॉग इन होऊन आपली नावेनोंदवावीत व त्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. व्होटर हेल्पलाईन अॅपच्या माध्यमातून फॉर्म क्र. 6 भरून नवमतदारांना आपली नावे नोंदविता येणार आहेत. याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी यादीत आपले नाव आहे की नाही? याची खातरजमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. जर मतदारयादीत नाव नसेल तर मंगळवार दि. 11 एप्रिलपर्यंत नाव नोंदविता येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे ज्यांची नावे नाहीत, त्यांना आणखी दोन दिवस आपली नावेनोंदविता येणार आहेत.
Previous Articleअट्टल मोटारसायकल चोराला अटक
Next Article कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकांना शिक्षण विभागाचा दणका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.