प्रतिनिधी / बेळगाव
सौंदत्ती तालुक्यातील हिरुर येथे उसाच्या मळय़ात काम करताना विजेचा धक्का बसून दोन शेतकरी जागीच ठार झाले आहेत. शनिवारी ही घटना घडली आहे. फकिराप्पा सिद्धाप्पा चंदरगी (वय 54), महादेव दुर्गाप्पा मेत्री (वय 40) दोघेही राहणार हिरुर अशी त्या दुर्दैवी शेतकऱयांची नावे आहेत. तुटलेल्या वीजतारेचा स्पर्श होऊन दोघा शेतकऱयांचा बळी गेला आहे. सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.