प्रतिनिधी /पणजी
जगप्रसिध्द असलेल्या भारत रंगमहोत्सवात गोव्यातील दोन नाटके सादर होणार असल्याची माहिती कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे. दिल्लीतील राष्ट्रीय नाट्या विद्यालायततर्फे आयोजित केला जाणार हा नाट्या महोत्सव जगप्रसिध्द असून त्यात भारताबरोबरच इतर अनेक देशातील नाटकेही सादर होत असतात. भरातील तसेच अन्य देशातील सुमारे 700 संस्थानी महोत्सवात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केले होते. राष्ट्रीय नाट्या विद्यालायाची निवड समिती महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांची निवड करीत असते. एकूण 80 नाटाकांची निवड केली असून त्यात गोव्यातील दोन नाटकांची निवड झाली असल्याने समस्थ गोमंतकीयांना ही अभिमानाची बाब आहे असेही मंत्री गोविंद गावडे म्हणाले.
काल शुक्रवारी कला आणि सांस्कृतीक भवनात घेतलेल्या पत्रकार परीषदेत मंत्री गोविंद गावडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ऊद्रेश्वर नाट्या संस्थेचे अध्यक्ष योगेश कापडी, प्रा. दिपक आमोणकर, सतीश नार्वेकर उपस्थित होते. 14 पेब्रूवारी ते 26 फेब्रूवारी पर्यंत हा नाट्यामहोत्सव होणार आहे. 10 राज्यातील विविध केंद्रावर एकूण 80 नाटके होणार आहेत. त्यात गोव्यातील दोन नाटेके नाशीक केंद्रावर होणार आहेत असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. यावेळी दोन्ही नाटकांचे पोस्टरांचे मंत्र्याच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
ऊद्रा स्टूडिओ तर्फे 19 फेब्रूवारी रोजी सोल टू सोल हे नाटक होणार आहे. सतीश नार्वेकर यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. गोव्यातील नामांकीत नाट्यासंस्था म्हणून ओळखली जाणारी ऊद्रेश्वर नाट्या संस्थेतर्फे विश्वामित्र हे नाटक दि. 20 फेब्रूवारी रोजी होणार आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन कै. प्र. अफसर हुसेन यांनी केले आहे. तर नाटकाचा मराठी अनुवाद विजयकुमार नाईक यांनी केला आहे. ऊद्रेश्वर पणजी ही नाट्यासंस्था गेल्या 19 वर्षा नाट्याक्षेत्रात कार्यरत आहे. आत्तापर्यंत या संस्थेने 100 हुन अधिक नाटकांची निर्मीती केली आहे. राज्यातील तसेच देशातील विविध नाट्यास्पर्धेत सहभागी होऊन 1 हजार 650हून अधिक पारितोषिके मिळविली आहेत. देश विदेशातही या संस्थेने नाटकाचे प्रयोग केले आहेत.
कला अकादमीचे केवळ तांत्रिक काम बाकी : गावडे
मंत्री गोविंद गावडे यांना कला अकादमी बाबत विचारले असता ते म्हणाले की कला अकादमीचे काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रीक बाबी बाकी राहिल्या असून त्याबाबत सविस्तर तपासणी करण्यात येत आहे. ते काम झाल्यानंतर कला अकादमी सुऊ होईल त्यासाठी आणखिन 45 दिवसांची गरज लागणार आहे. कला अकादमी सुऊ करण्यासाठी आता जरी काहीसा अवधी लागला तरी काम व्यवस्थित होणे गरजेचे आहे असेही मंत्री गावडे म्हणाले.