दक्षिण भारतातील अवाप् करणारा प्रकार
जर तुम्ही रेल्वेमधून प्रवास करत असाल तर दोन स्थानकांदरम्यान किती अंतर सर्वसाधारणपणे असते हे तुम्हाला माहितील असेल. परंतु भारतात एक असे ठिकाण देखील आहे, जेथे दोन रेल्वेस्थानकांमधील अंतर इतके कमी आहे की ते जाणून घेतल्यावर तुम्ही अवाप् व्हाल.
सोशल मीडियाद्वारे एका व्यक्तीने व्हिडिओ तयार करत याची माहिती दिली आहे. दक्षिण भारतात दोन रेल्वेस्थानकांमधील अंतर सर्वात कमी आहे. ही दोन्ही रेल्वेस्थानके केवळ 250 मीटर अंतरावर आहेत.
दोन्ही स्थानकांमधील अंतर संबंधित व्यक्तीने कॅमेऱयाद्वारे टिपले आहे. एक स्थानक संपताच दुसरे स्थानक सुरू होते. काही पावलांच्या अंतरावर तयार करण्यात आलेली ही स्थानके अत्यंत विशेष आहे. या दोन स्थानकांमधील अंतर इतके कमी कसे असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संबंधिताने ‘दक्षिण भारतात दोन रेल्वेस्थानकांमधील अंतर सर्वात कमी आहे, ही स्थानके पेरम्बूर कॅरिज वर्क्स आणि पेरम्बूरदरम्यान आहेत, प्लॅटफॉर्मच्या टोकांमधील अंतर केवळ 250 मीटर आहे’ असे नमूद केले आहे. 21 जून रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखो ह्यूज मिळाले आहेत. 27 हजारांहून अधिय युजर्सनी व्हिडिओला लाइक केले आहे. व्हिडिओवर नेटिझन्सच्या कॉमेंट्स देखील येत आहेत. एका युजरने ‘हे अंतर 250 मीटरपेक्षा कमी आहे’ अशी कॉमेंट केली आहे