चिपळूण प्रतिनिधी
चिपळूण मधील पाली नदीत दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मासे पकडण्यासाठी नदीपात्रात उतरली असता ही मुले पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहेत.
बुडालेले दोन्ही मुले ओमळी गावची रहिवाशी असून हर्षद यादव (11) आणि विक्रम देवांग (23) असे दोन मृत मुलांची नावे आहेत. घटनेची माहीती मिऴताच गावातील नागरीकांनी नदिच्या काठावर एकच गर्दी केली होती. तातडीने बेपत्ता मुलांची शोधमोहीम राबवण्यात येऊन त्यांचा शोध घेण्यात आला. बऱ्याच वेळाने मृतदेह सापडल्यावर दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्ट मॉर्टम साठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.