पुणे / प्रतिनिधी :
देवदर्शनासाठी जात असलेल्या पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले.
गौरव लालवानी (वय 19, रायपूर, छत्तीसगढ) आणि रचित मेहता (18, मु. रा. कोलकाता) अशी या अपघातात मयत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर तीन विद्यार्थिनींसह एकूण पाचजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर मयत आणि जखमी झालेले विद्यार्थी हे पुण्यातील नामांकित एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सासवड परिसरातील नारायणपूर येथील दत्त महाराज मंदिरात देवदर्शनासाठी ते सोमवारी रात्री महिंद्रा कंपनीच्या एक्सयूव्ही-300 या कारने जात होते. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार दोन दुकानांना धडकून पलटी झाली. या घटनेत जागेवरच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थिनींसह पाचजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत सासवड पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा : उत्तराखंड हिमस्खलनात 4 गिर्यारोहकांचा मृत्यू, 29 जण बेपत्ता