Uday Samant Car Attack: माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांच्यावर पुणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचे रत्नागिरीत जोरदार पडसाद उमटले आहेत. या हल्ल्याप्रकरणी जाहीर निषेधाचे बॅनर नाक्या-नाक्यावर झळकले आहेत. तर सामंत समर्थकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका असा इशाराही उदय सामंत समर्थकांनी बॅनरबाजीतून दिला.
पुण्यातील हल्ल्याबाबत रत्नागिरीत नाक्या-नाक्यावर निषेधाचे जोरदार फलक झळकले आहेत. ‘विचारांची लढाई विचारानेच लढाईयची असते, असे हल्ले करणारे हे भ्याडच’ असा मेसेज त्यादवारे देण्यात आला आहे. सामंत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रत्नागिरीत उदय सामंत समर्थकांकडून तीव्र निषेधही नोंदवण्यात आला. त्यासाठी जयस्तंभ येथील सामंत यांच्या संपर्क कार्यालयासमोर समर्थकांनी जोरदार निदर्शने करण्यात केली. हल्ला प्रकरणी त्यानंतर पोलिसांनाही निवेदन देण्यात आले.