मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अलीकडच्या भूमिकेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जे भोंगे अनधिकृत आहेत ते काढा. हिंदू सणाच्या मिरवणूक १० वाजता बंद होतात. मग हिंदू सणाने नियम आहेत का? भोंग्याचे डिसेबल कमी करा. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता अडचणीत आले आहेत. त्यांनी भगवे उतरवून हिरवे घातले आहे. म्हणून त्यांना मशिदीच्या भोंग्याची काळजी आहे. असा बोचक टीका किरीट सोमय्या यांनी केली
ध्वनी प्रदूषणाच्या नावावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेडची वाट लावली. मग आता ज्या धर्माच्या नावावर सकाळी ४ वाजता पासून एवढ्या डेसिबलचे भोंगे चालू का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी योग्य ती स्थिती निर्माण केली. म्हणून ३७० कलम गेले, बाबरी मशिदीच्या जाग्यावर राम मंदिर निर्माण झालं. योगी सरकारने नियम केले, पहाटेची अजान बंद होणार. अजान करा पण लाऊडस्पीकरची गरज काय? असं झाल्यास देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची काही गरज नाही. उद्धव ठाकरेंनी हातात हिरवे घेतल्याने ही शरणागती पत्करली आहे, असं सोमय्या म्हणाले.
गणेश विसर्जन मिरवणूक दहानंतर लाऊड स्पीकर बंद होतो. ज्या धार्मिक स्थळांवर अधिकृत भोंगे आहेत, त्यांचे डेसिबल कंट्रोल करा, जे अनधिकृत आहे ते काढा. हिंदू सणांवर का हे नियम आहेत? नियम मला मान्य आहेत, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे, शिवसेनेची आता टरकली आहे. अनधिकृत भोंगे कुठे आहेत, तिथे त्यांची जाण्याची हिम्मत नाही. तिथे गेले तर खुर्ची जाणार, तिथे गेले तर वसुली बंद होणार, अशी टीकाही त्यांनी केली.