प्रतिनिधी / बेंबळे
पुणे, सोलापूर व अहमदनगर या तीन जिह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण सोमवारी रात्री मृत साठय़ात प्रवेश केला आहे. मृत साठय़ातील सर्वात मोठय़ा धरणांपैकी एक असलेले उजनी धरण गत पाच वर्षांच्या कालखंडात यंदा जून महिन्यात मृत साठय़ात प्रवेश केला आहे.
उजनी धरणाच्या 123 टीएमसी पाणीसाठय़ापैकी 54 टीएमसी पाणी उपयुक्त तर 63 टीएमसी हा मृतसाठा धरला जातो. तर 6 टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी आहे. उजनी धरण 100 टक्के भरते. त्यावेळी 117 टीएमसी पाणी असते आणि 111 टक्के पाणी साठवले जाते. त्यावेळी पाणीसाठा 123 टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील 60 टीएमसी पाण्याचा वापर झाला असून मृत साठय़ातील 63 टीएमसी पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योग धंद्यासाठी होणार आहे. गतवषी याच दिवशी उजनी धरण वजा 20 टक्के होते. यंदा गतवषीच्या तुलनेत 20 टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याची उणीव भासणार नाही.
मागील वषी उजनी धरण आणि पुणे जिह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने ऑक्टोबर 5 रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. उजनी धरणात सध्या वजा 0.19 टक्के पाणीसाठा आहे. दरवषी सोलापूर शहराला पिण्यासाठी आणि शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. हे पाणी नदीद्वारे सोडण्यात येत असल्याने पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होतो. सध्या उजनी धरणातून शेतीसाठी कालव्याद्वारे 1000 क्मयुसेस, बोगद्यातून 70 क्मयुसेस, सिना-माढा उपसा सिंचन 111 तर दहिगाव उपसासिंचन योजना 88 क्मयुसेस अशाप्रकारे उजनीवरील योजनांमधून उपसा सुरू आहे. उजनीत उपलब्ध असलेला मुबलक जलसाठा व सुरू झालेला पावसाळी हंगामामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही.
सध्या उजनी धरणातील पाणीपातळी
एकूण पाणीपातळी – 491.015 मीटर
एकूण क्षेत्रफळ – 197.28 चौ. कि. मी.
एकुण पाणीसाठा – 63.55 टी.एम.सी.
उपयुक्त साठा – (उणे)0. 10 टी.एम.सी.
टक्केवारी – (उणे) 0.19 टक्के