आमदार कक्षांकडेही अधिकाऱयांचे साफ दुर्लक्ष : बाटल्या-पत्रावळय़ाही कक्षातच : नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्मयाचे मुख्य कार्यालय आणि विकास साधणारे कार्यालय म्हणून तालुका पंचायत कार्यालयाकडे पाहिले जाते. मात्र, या कार्यालयात कोणाचा मागमूस कोणाला नाही, असे चित्र दिसून येत आहे. तालुका पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे येथील वर्दळ कमी झाली असे नाही. या ना त्या कारणाने नागरिक येथे येतच असतात. अशातच आता मागील काही दिवसांपासून अध्यक्षांचे कक्ष रिकामे आहेत. मात्र, त्या ठिकाणी अवस्वच्छता पसरली आहे. याकडे अधिकाऱयांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
तालुका पंचायत अध्यक्षांच्या कक्षात प्लास्टिक बाटल्या, पत्रावळय़ा व इतर कचरा साचून आहे. त्यामुळे कार्यकाळ संपला की त्या कक्षाकडे तालुका पंचायतमधील अधिकाऱयांचे दुर्लक्ष होत असते, हे स्पष्ट झाले आहे. अस्वच्छतेमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत असून आजी-माजी अध्यक्षांनीही नाराजीचा सूर उमटविला आहे. त्यामुळे तालुका पंचायतच्या वरि÷ अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन खोलीची स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांच्याकडे दोन तालुक्मयांचा पद्भार आहे. त्यामुळे खानापूर आणि बेळगाव येथील कारभार सांभाळताना त्यांची अवस्था बिकट होते. मात्र, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी जसे महत्त्वाचे आहेत तसेच तालुका पंचायत अध्यक्षांचा कक्षही महत्त्वाचा आहे. त्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष कसे करण्यात येते? याचबरोबर या ठिकाणी दोन आमदारांचेही कक्ष आहेत. त्यांच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे येथे सफाई करणारे कर्मचारी आहेत की नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
तालुका पंचायतमध्ये स्वच्छता करावी
तालुका पंचायत कार्यालयात दररोज शेकडो नागरिक कामासाठी येत असतात. मध्यंतरी आमदारांच्या कक्षात त्यांची बसण्याची व्यवस्था होत होती. त्यानंतर काही जण अध्यक्षांकडे तक्रारी घेऊन येत होते. मात्र, आता कार्यकाळ संपल्याने त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. तरीदेखील अध्यक्षांच्या कक्षात मागील कांही दिवसांपासून झाडू मारली नाही हे येथील अस्वच्छतेवरून दिसून येते. काम कमी आणि उचापती करणारे अधिकारी अधिक आहेत. त्यामुळे आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुका पंचायतमध्ये स्वच्छता करावी व आमदारांबरोबर इतर कक्षांचीही स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.