अध्याय पंचविसावा
अभेदभावाने परब्रह्म हे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्यामध्ये निरंतर परिपूर्णच असते हे भगवंतानी संख्याशास्त्र सांगण्याच्या निमित्ताने उद्धवाला सांगितले. हे सांख्यमत ऐकून उद्धव आपल्याच मनाशी विचार करू लागला की, भगवंतानी सांगितल्याप्रमाणे संसार हा मुळातच खोटा आहे परंतु हे समजत असूनही मनुष्याला तो सोडवत तर नाहीच उलट तो अहंभावामुळे फोफावतच राहतो. म्हणून अहंभाव सोडून द्यावा असा विचार केला तर अहंकार चित्ताला असा काही जडलेला आहे की, सोडायला गेलो तर मुळीच सुटत नाही. भगवंतानी कितीही वेळा अहंकार किवा ‘मी’ पणा सोडण्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे परंतु माझ्या सामर्थ्याने मी तो सोडू शकत नाही. बरे, श्रीकृष्णाला तरी आता किती वेळा विचारू? परंतु भक्ताच्या मनातलं खडा न खडा जाणणाऱया भगवंताना उद्धवाला पडलेली चिंता लगेच कळून आली. ते उद्धवाला अहंता नाहीशी करण्याची युक्ती ते आपणहूनच सांगू लागले. उद्धवासारख्या भक्तात जे जे काही न्यून असेल, ते ते परिपूर्ण करावयाला ते तयारच असतात. त्यांच्या या ब्रीदाला जागून, ते अहंकारापासून सुटका करून घेण्याची युक्ती सांगणार आहेत. ही युक्ती उद्धवाला विशेष करून सांगण्याचे कारण सांगताना नाथमहाराज म्हणतात, या जगामध्ये अनेक योनी आहेत. त्यात मनुष्यपणा हा अत्यंत उत्तम होय. त्यातही विचारशील तर, वेदशास्त्रं जाणणारा आणि मुमुक्षु, म्हणजे आपल्या वागणुकीमुळे जे जे पाप पुण्य जमा होईल ते आपल्याला भोगावे लागेल याची जाणीव असलेला पुरुष त्रिगुणातून मुक्त होण्यास योग्य ठरतो. असा पुरुष वेद, शास्त्र, विवेक ह्यांनी संपन्न असून भगवंतांचे भजन करत असेल आणि त्यांना जर अनन्यभावाने सर्वस्वी शरण जाणारा असेल तर त्याच्यावर त्यांची परिपूर्ण कृपा असते. त्यांच्या कृपेनेच तो आत्मज्ञान पावून त्यांच्या भजनात रममाण होतो. उतम पुरुषाची सर्व लक्षणे उद्धवात असल्याने, भगवंत अत्यंत प्रेमाने उध्ववाला म्हणाले, जोपर्यंत मनुष्य गुणांवर पूर्णपणे जय मिळवत नाही, तोपर्यंत त्याचे सुखदुःख व अहंभाव हा वाढणारच. सूखदुखाची भावना माणसाला अहंकारामुळे होत असते म्हणून जर माणसाने विवेकाला सत्त्वगुणाची जोड दिली तर तो तिन्ही गुणांचा समूळ उच्छेद करून टाकतो. विवेक म्हणजे चांगलं काय, वाईट काय हे कळण्याची व त्यानुसार वागण्याची बुद्धी. त्याप्रमाणे वागत गेल्यास मूळचे निर्गुणत्व आपोआप प्रगट होते. भगवंत उद्धवाला म्हणाले, हे पुरुषश्रे÷, कोणत्या गुणामुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो, ते मी तुला सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण एकमेकात न मिसळता भिन्न भिन्न असतात. प्रथम सत्व गुणाचे महात्म्य तुला सांगतो. मनाचा संयम, इंद्रियनिग्रह, सहिष्णूता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषयांच्या उपभोगांबद्दल अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता इत्यादी सत्त्वगुणाच्या वृत्ती होत. वृत्ती म्हणजे स्वभाव असं समजायला हरकत नाही, यातील एकेक तुला उलगडून सांगतो. बाह्यस्फूर्तीला सोडून देऊन आपले मन अखंड आत्म्यामध्ये एकाग्र करणे यालाच ‘शम’ असे नांव आहे. बाह्य इंद्रियांची जी चरफड असते, तिचे शांतीशी ऐक्मय करून विषयाची इच्छा आवरून धरणे, याचे नाव ‘दम’. उद्धवा! जितक्मया आनंदाने आपण सुख भोगतो, तितक्मयाच संतोषवृत्तीने दुःखही सहन करणे, याचे नाव शुद्धसत्त्वात्मक तितिक्षा होय. मी कोण? कोठचा? माझे स्वरूप काय? मी निष्कर्म आहे की कर्मबद्ध आहे? अशा प्रकारे आत्मविचार करणे ह्याचे नाव ईक्षापरिपाक होय. जागृती, स्वप्नं व सुषुप्ती या तिन्ही स्थितींमध्ये भगवतप्राप्तीसाठी चित्त निरंतर झुरणीला लागणे याचंच नाव ‘तप’ होय. आवडीने विष पिववत नाही, त्याप्रमाणे प्राणांतीही जो खोटे बोलत नाही, निरंतर सत्यच बोलणे असते, हेच सत्य होय. उद्धवा! जो आपण होऊन स्वप्नातसुद्धा प्राणिमात्रावर नि÷gरपणा कधी धरीत नाही, त्याची तीच खरोखर परिपूर्ण भूतदया होय असे समज. माझे मुख्य हित कशात आहे? असे जे पूर्वीचे स्मरण, त्याचे नाव स्मृती हे लक्षात ठेव.
क्रमशः