ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तीन्ही दलाच्या सेवा प्रमुखांनी पत्रकार परिषदेत बहुचर्चित ‘अग्निपथ’ नावाच्या अल्प-मुदतीच्या सैन्य भरती ही योजना जाहीर करून त्यासंबंधी माहिती दिली. पगारांचा फुगवटा आणि वाढती पेन्शनची बिले कमी करण्याचा उद्देश असलेली ह्या योजनेचे केंद्र सरकारने अनावरण केले. या अग्निपथ योजनेमध्ये अल्प कालावधीसाठी तरुण सैनिकांची भरती करण्यात येईल.
या नवीन योजने अंतर्गत भरती झालेल्या सैनिकांना सशस्त्र दलात ‘अग्निवीर’ म्हणून सामील केले जातील. ही एक नवीन निर्माण केलेली वेगळी रँक आहे. या रँकची भरती वारसा भरती मॉडेल च्या अगदी विरूद्ध आहे. ‘अग्निवीरांसाठी तिन्ही सेवांमध्ये एक वेगळी रँक तयार करण्यात येईल तसेच त्यांच्या गणवेशाचा भाग म्हणून एक वेगळे चिन्ह त्यांच्यासाठी तयार करण्यात येईल.