ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा इशरा भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्या नंतर मनसैनिक आक्रमक झाला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. दरम्यान, बृजभूषण यांच्या विरोधानंतर साध्वी कांचनगिरी (Sadhvi Kanchangiri) यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून राज ठाकरेंना अयोध्येला येऊ द्यावं तसेच बृजभूषण यांना आवर घालावा असं या पत्रात लिहलं आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेवून देणार नाही असा बृजभूषण यांनी दिला आहे. दरम्यान बृजभूषण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत साध्वी कांचनगिरी यांनी बोलताना राज ठाकरे यांनी आपल्याकडे उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाबद्दल खेद व्यक्त केला होता असा दावा केला होता. आता कांचगिरी यांनी बृजभूषण यांचा विरोध कमी करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहत राज ठाकरेंना अयोध्येला येऊ द्या, बृजभूषण यांना आवरा अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
राज ठाकरे यांचा ५ जून रोजी नियोजीत अयोध्या दौरा आहे. बृजभूषण यांच्या इशाऱ्यानंतर मनसेनेसुद्धा बृजभूषण यांना आव्हान दिलं होतं. तर आता हा वाद शांत करण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. त्यांनी मोदींना पत्र लिहून बृजभूषण यांना आवरावं आणि राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर येऊ द्यावं अशी मागणी केली आहे. आता बृजभूषण काय करणार हे पाहावं लागेल.