कोट्यावधींचा तूप-तेलाचा साठा जळून खाक
वृत्तसंस्था/ सहारनपूर
उत्तर प्रदेशात सहारनपूरमधील अदानी ग्रुपच्या गोदामाला भीषण आग लागली. बेहट रोडवर असलेल्या नजीरपुरा गावात अदानी ग्रुपचे गोदाम आहे. येथे तूप आणि रिफाइंड तेल ठेवण्यात आले होते. तेलाचा हा सर्व साठा आगीत भस्मसात झाल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग विझविण्यासाठी 6 जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या पथकाने सुमारे 10 तासांनंतर आग आटोक्मयात आणली. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंपनीचे अधिकारी नुकसानीचा अंदाज घेत आहेत. कोट्यावधी रुपयांचे तूप आणि रिफाइंड तेल जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. देहात कोतवाली परिसरातील नजीरपुरा गावातील गोदामामधून संपूर्ण जिह्यात तेलाचा पुरवठा केला जातो.