कोल्हापूर प्रतिनिधी
मागिल काही महिन्यांपासून लंपी आजाराने पशुधन प्रभावी झाल्याचे दिसुन येत आहे. पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या साथीला घाबरु नये. काही लक्षणे आढळल्यास त्यासंबंधाची माहीती पशुधन आधिकाऱ्यास द्यावी आणि जनावारांचे लसीकरण करून घ्यावे. या रोगाला थांबवण्य़ासाठी संपूर्ण यंत्रणा प्रशासनाकडे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ते आज आपल्या कार्यालयात पत्रकारंशी बोलत होते.
जनावारंच्या लंपी या साथीसंबंधी माहीती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. ते म्हणाले की, “पशुपालकांनी माश्या, डास, गोचिड होणार नाही य़ाची पूर्ण खबरदारी घ्यावी. तसेच जनावारांची वाहतूक किंवा प्रवास पुर्णपणे थांबवावी, यासाठी प्रशासनाने अगोदरच निर्देश दिले आहेत. पोलिस प्रशासन सुद्धा यावर विशेष काम करत आहे.”
“आपल्या जनावारांचे लसीकरण पशुवैद्यकिय अधिकाऱ्यामार्फत करावे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात लसी शिल्लक आहेत. जिल्ह्यामध्ये एकुण गाई आणि बैलांची संख्या अंदाजे 2 लाख 83 हजार आहे. आणि आपल्याकडे त्याहीपेक्षा लसींची मात्रा उपलब्ध आहे. कालपर्यंत 1 लाख 47 हजार जनावारांचे लसीकरण पुर्ण केले आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व जनावारांचे लसीकरण पुर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.”
कोल्हापूर जिल्ह्यात 108 जनावरे लंपीने बाधित तर 9 जनावारंचा मृत्यु झाला आहे. ज्यामध्ये 6 गाई आणि 3 बैलांचा समावेश आहेत. तर 108 बाधित जनावारांपैकि 30 जनावारे या आजारातून बरे झाली आहेत.
कोल्हापूर शहरातील भटक्या जनावारांचे लसीकरण सुरू 135 पेक्षा जास्त जनावारांना लसीकरण केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.