स्वामीजींनी रविवारी घेतले माशेल येथील देवकीकृष्णाचे दर्शन
वार्ताहर /माशेल
आजच्या धाकाधुकीच्या व्यस्त जीवनात प्रत्येकाने कामधंदा व कुटूंब सांभाळून समाजाचाही विचार करावा. जो दुसऱयासाठी मागतो त्याला देव कैकपटीने जास्त फळ तसेच बळ देतो असे उद्गार श्री श्री वामनाश्रम स्वामीजींने माशेल येथे देवकीकृष्ण सभागृहात आशिर्वचन करताना काढले.
वैश्यकुलगुरू हळदीपूर श्री शांताश्रम मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी सुरू केलेल्या शांकर एकात्मता पदयात्रेची माशेलात भव्य स्वागत करण्यात आले. ते पुढे बोलताना म्हणाले प्रत्येकाने आपले आचरण चांगले ठेवावे. आध्यात्मिक उन्नती साध्य करा, स्वतःपुरता विचार करत न बसता आपल्या सभोवतालच्या समाजातील इतर घटकांसाठी सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. वैश्य समाजाच्या काशी येथील मठाची पुर्नबांधणी करण्यासाठी देशभरातील समाज बांधवचंना एकत्र करण्याच्या बाबतीत या पदयात्रेचा नक्कीच लाभ होणार असे स्वामीजी म्हणाले.
गुरूमठाची पुर्नबांधणी व समाजबांधवांना संघटीत करणे हाच उद्देश
केरळमधील कालडी येथून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. केरळ येथून सुरू झालेल्या पदयात्रेचे आगमन फोंडय़ात झाल्यानंतर सावईवेरे, बेतकीमार्गे रविवारी रात्री 8 वा. माशेलात पोचली. प्रथम स्वामीजींचे देवकीकृष्ण मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. यावेळी त्याच्यासमवेत माशेल भागातील वैश्य बांधव सहभागी झाले होते. काशी येथी मुळ वैश्य गुरूमठाचे पुर्ननिर्माण करणे. समाजबांधवांना एकत्रित करणे व गुरूमाऊली आशिर्वाद देणे यासाठी ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे.
स्वामीजींचे श्री देवकीकृष्ण मंदिराच्या सभागृहात आगमन झाल्यानंतर प.पू.स्वामीजींने समाजबांधवांना आशिर्वाद दिला. दुसऱया दिवशी सकाळी प. पू. स्वामीजींनी चंद्रमौळीश्वर पूजा केल्यावर समाजबांधवांना आशिर्वाद दिला. दुपारी 2.30 वा. साखळी येथे प्रयाण केले.