वार्ताहर/ अथणी
अथणी शहर व पूर्व भागामध्ये वळिवाच्या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे बेदाणे भिजल्यानेहमी मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांसाठी काढलेले कर्ज कसे फेडायाचे याची चिंता बागायतदारांना लगली आहे. नुकसानीचा सर्व्हे करुन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अथणी तालुक्मयातील शेतकरी उन्हाळय़ाची चटके सहन करत असताना वळिवाने हजेरी लावल्याने पूर्व भागातील बेदाणे करण्यासाठी घातलेली द्राक्षे भिजून नुकसान झाले आहे. यलहडगी, ऐगळी तेलसंग, कोहळ्ळी, रामतीर्थ, ककमरी, कर्नाळ, बन्नूर या परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात बेदाणे शेड आहेत. शेतकरी बेदाण्याला अधिक किंमत असल्याने बेदाणे निर्मितीकडे वळले आहेत. असे असताना वळिवाच्या तडाख्याने मोठा फटका बागायतदारांना बसला आहे.