सध्या ‘सुजलाम्’ असलेल्या महाराष्ट्रात आणखी चैतन्याचे वारे खेळवण्यासाठी आणि ही भूमी ‘सुफलाम्’ करण्यासाठीच जणू श्री गणरायाचे आज आगमन होत आहे. यंदा वरुणराजाने कृपा केल्याने राज्यात उत्तम पाऊसपाणी आहे. अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. बळीराजाला खरिपाकडून चांगली अपेक्षा आहे. शेतशिवार हिरवाईने नटल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. श्री गणेशाच्या आगमनाआधीच असे प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते, त्याच्या आगमनाने ते आणखी विलोभनीय होईल. मागच्या तीन वर्षांमध्ये कोरोनामुळे सामान्य माणूस हतबल झाला होता. आरोग्याच्या प्रश्नापासून आर्थिक अडचणींपर्यंत अनेक विवंचनांनी तो त्रस्त झालेला होता. तथापि, यावषी कोरोनाचे प्रमाण घटल्याने सगळीकडे उत्साह आहे. जनजीवन पूर्वपदावर आले आहे. उद्योग-व्यवसाय बऱयापैकी सुरू झाले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. गणेश ही बुद्धीची देवता असल्याने विविध कलाविष्कारांना या काळात चालना मिळते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली त्याला व्यापक अर्थ होता. ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव हे माध्यम बनवले. 1883 साली त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी त्यापूर्वी साधारण आठेक वर्षे ते सोलापुरात आले होते. सोलापुरात तेव्हा आजोबा गणपती प्रति÷ित होता, आजही आहे. तिथल्या एका कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जनतेला एकत्र आणण्यासाठी अशा उत्सवांची गरज आहे हे त्यांच्या ध्यानात आले. त्यावरून लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा मिळाली. नागरिकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्याचा निश्चय करण्यासाठी हा उत्सव कामी आला. सार्वजनिक गणेशोत्सवाचा टिळकांचा उद्देश स्वातंत्र्यप्राप्तीमुळे सफल झाला आहे. तथापि, स्वराज्याचे ‘सुराज्य’ करण्यासाठी जनमानसाला संबोधित करत राहावे लागणार आहे. प्रबोधनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महत्त्वपूर्ण आहे. बुद्धी, वैभव आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणजे गणराय. या तेजस्वी आणि दीप्तीमान देवतेने जनताजनार्दनाचे भले करावे, त्यांच्यावरील संकटे दूर करावी, अशीच प्रार्थना आहे. ज्ञानाबरोबरच विज्ञानावर नि÷ा आणि विवेकाचा जागर महत्त्वाचा आहे. राज्यकर्ते आणि प्रशासकीय व्यवस्थेतून जनतेचे हित पाहिले जाते. महाराष्ट्रात सत्तेच्या सारीपाटावर सतत नवनव्या खेळय़ा केल्या जात आहेत. डाव मांडले जात आहेत. पण त्यात लोकसेवा किंवा नागरिकांचे भले अभावानेच पाहिले जाते. अर्थवत्ता कमवणे आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सत्तेचा वापर केला जात असल्याचे चित्र आपल्याला आढळते. कोणत्याही पक्षाचे राज्य असले तरी यात फारसा फरक दिसत नाही. विधिमंडळात एकमेकांना टोमणे मारून आणि आरोप-प्रत्यारोपाचा गदारोळ करून कामकाज संपवले की पुढच्या अधिवेशनापर्यंत वेळ मारून नेली जाते. एकमेकांवर कुरघोडय़ा करण्यात आपण कसे पटाईत आहोत, हे परस्परांना पटवून दिले जाते. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होते, याचे भान राज्यकर्त्यांना राहत नाही. श्री गणेशाने त्यांना सद्बुद्धी द्यावी असे आर्जव करण्याव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या हाती काहीही नाही. कोकणातील अनेक चाकरमाने मुंबईत राहतात. गणेशोत्सवासाठी ते आपल्या गावाकडे जातात. त्यांना खूष करण्यासाठी टोलमाफीचे अस्त्र काढले जाते. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू आहे. कोकणात आपापल्या गावी जाणाऱया चाकरमान्यांची सोय व्हावी, यासाठी रेल्वे-एसटी बसेस जादा सोडल्या जातात. तथापि, विकासाबाबत मागे असलेला कोकण सुधारावा, तिथल्या स्थानिकांना आपल्या गावीच सन्मानजनक अर्थप्राप्ती व्हावी, नोकऱया मिळाव्यात यासाठी योजना आखल्या जात नाहीत. कोकणात पदवीधर झालेल्या तरूणापुढे मुंबईत किंवा अन्यत्र जाऊन नोकरी मिळवण्याखेरीज कोणताही पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोकणात पर्यावरणपूरक उद्योग वाढवले पाहिजेत, तिथल्या निसर्गसौंदर्याचा विचार करून पर्यटनउद्योगाची भरभराट होईल हे पाहिले पाहिजे. त्याऐवजी चाकरमान्यांची गणेशोत्सवाला गावाकडे जाण्याची ‘सोय’ करण्याची कल्पना सरकार लढवते आणि कोकणवासीयही त्यावर खूष होतात. विकासाच्या योजना कागदावर तरी येतात की नाही, हा प्रश्नच आहे. गोवा, केरळाप्रमाणे कोकणाचा विकास व्हायला हवा. ‘कोकणाचा कॅलिफोर्निया’ होण्याची आशा अनेकजण लावून बसले आहेत, पण ते निवडणुकीत प्रचारापुरते वापरले जाणारे अस्त्र आहे. सोलापूरप्रमाणेच मराठवाडय़ात परतीच्या पावसावर मोठी भिस्त असते. येत्या काळात मराठवाडय़ात वरूणराजा कृपा करेल, असा हवामानखात्याचा अंदाज आहे. राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये मराठवाडय़ाचे मंत्री आहेत. त्यांच्याकडून या मागास विभागाच्या विकासाची अपेक्षा आहे. महागाईच्या ओझ्याखाली सर्वसामान्य माणूस दबला आहे. भाजीपाल्यापासून किराणा मालापर्यंत सगळी भाववाढ झाल्याने जनता मेटाकुटीला आलेली आहे. अगदी श्री गणरायाच्या मूर्तींच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत. भारतासारखीच अमेरिकेचीही स्थिती आहे. तिथेही महागाईच्या दराने उच्चांक गाठला आहे. इंधनाच्या दरावर नियंत्रण ठेवून महागाई कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य नोकरदाराच्या उत्पन्नात वाढ कशी होईल, ते पाहणे महत्त्वाचे आहे. विदर्भासह अन्य भागात शेतकऱयांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पुढच्या काळात त्यांच्यावर ही वेळ येऊ नये, यासाठी सरकारचे विशिष्ट धोरण असायला हवे. कोणत्याही संकटांचा सामना करण्याचे धैर्य गणराय देतो. त्याच्या एकूणच स्वरूपामागे एक तत्व आहे. त्याचे वाहन असलेल्या मूषकापासून ते गजमुखापर्यंत आणि हातात असलेल्या आयुधांपासून लंबोदरापर्यंत सगळय़ा गोष्टींच्या मागे विचाराचे अधि÷ान आहे. मानवी जीवन व्यवहाराशी ते निगडीत आहे, त्यातून बोध घेणे गरजेचे आहे. जीवनामध्ये संघर्ष निरंतर असतोच. मग तो अब्जाधीश असेल नाही तर झोपडपट्टीत राहणारा वा सामान्य नागरिक असेल. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने हा संघर्ष करावा लागतो, त्याला तोंड द्यावे लागते. त्यावर तोडगा काढावा लागतो. श्री गणरायाच्या आगमनाने राज्यातील कर्त्या-धर्त्या मंडळींचा विवेक जागा होवो आणि गणेशभक्तांचे आयुष्य सुसह्य होवो, अशी प्रार्थना करणे हेच आपल्या हाती आहे.
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.