ऑनलाईन टीम/तरुण भारत
लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi)सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ करत असते. तिच्या व्हिडिओला अनेकजण पसंदी दर्शवतात. हेमांगी नेहमीच हटके पोस्ट करत असते. आजाही तिने वटपोर्णिमेची (Vatpornima 2022) एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने महिलांना सल्ला दिला आहे. साता जन्माच्या गोष्टी! अशा मथळ्याखाली तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती म्हणते नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आहे अशा आशयाची तिने पोस्ट शेअर केली आहे.
हेमांगीची नेमकी पोस्ट काय आहे
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी! वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलं ही आयुष्य वाढेल कदाचित! काय? अस म्हणत सवालही केला आहे.त्याचबरोबर तिने तळटीपही दिली आहे.
हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन; म्हणाले, …म्हणून पंकजा मुंडेना उमेदवारी दिली नाही
तळटीपमध्ये हेमांगी म्हणते, यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत.उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा! तरीही त्यातून जर कुणी “म्याडम तुमी उपास धरला काय” विचाणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो! असेही ती म्हणाली आहे.