अध्याय सोळावा
भगवंत त्यांचं अस्तित्व ज्या गोष्टीत, व्यक्तीत ठळकपणे जाणवते अशा विभूतींबद्दल सांगत आहेत. त्या बघून लक्षात येतं की, ज्या गोष्टी उत्तम आणि श्रे÷ आहेत त्यात भगवंतांचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं. तसं बघायला गेलं तर सर्वांच्यातच ईश्वरी अस्तिव असतं पण ज्यांनी स्वतःतील ईश्वरी अंश फुलवलेला असतो ते स्वतःच्या वेगळेपणानं उठून दिसतात आणि त्यामुळे ते ईश्वराच्या विभूतीत जमा होतात. विभूतींबद्दल पुढं सांगताना भगवंत म्हणाले, सेनापतींमध्ये श्रे÷ जो स्कंद (कार्तिकस्वामी), तो मी. स्वधर्मप्रवर्तकांमध्ये अग्रगण्य व ब्राह्मणांमध्ये अत्यंत पूज्य जो ब्रह्मा तो मी. ज्याच्या योगाने देव, ऋषी, पितर, इतर प्राणिमात्र आणि सर्व विश्व तृप्त होते, तो यज्ञातील ब्रह्मयज्ञ मी होय. कोणत्याही प्राणिमात्राला दुःख होईल असे भाषण करूं नये, असे जे व्रतांमध्ये अहिंसाव्रत ते मीच स्वतः होय. कोणाला वायूने पवित्रपणा येतो, कोणाला अग्नीने पवित्रपणा येतो, कोणाला पाण्याने पवित्रपणा येतो. कोणी भाषणानेच पवित्र होतात तर कोणी बुद्धीने पवित्र होतात पण अशा ह्या सर्वांमध्ये जे पवित्रपण म्हणून आहे, ते माझंच स्वरूप होय. पावनालाही पावन करणारा एक मीच आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. जग हे माझ्या नामानेच पवित्र होते, हे सर्वसंमत आहे. त्या माझे जे स्वरूप येथे आहे ते पुनीताहूनही अत्यंत पुनीत
आहे.
ज्याच्या योगाने साधकांच्या अंतःकरणामध्ये परमानंद उत्पन्न होतो व समाधीचे ज्ञान प्राप्त होते, असा जो नाना प्रकारच्या योगांमध्ये ‘आत्मनिरोध’ म्हणून योग आहे, तो योग मी आहे. आणखी उद्ध्वा ! मुख्यत्वे विवेक हाताशी घेऊन नीतीन्यायानेच विजयी होण्याची जो इच्छा करतो, त्या नीतीचीही नीती मीच श्रीकृष्ण होय, हे निश्चित समज.
केवळ आत्मानात्माचा विचार करणारी अशी जी अध्यात्मविद्या, ती विद्या मी आहे. माझ्याच योगाने विवेक वृद्धिंगत होतो. ज्याच्यामध्ये विकल्पाला अंतच नाही असा, वादांमध्ये अनंत चालणारा जो वाद, तो वाद मी. उद्धवा ! आख्याती, अन्यथाख्याती, शून्यख्याती, सत्ख्याती आणि अनिर्वचनीय अशी जी ख्याती ते वादही खरोखर मीच होय. शतरूपा आणि मनु हे दोन्ही मीच. सदासर्वकाळ बदरिकाश्रमात राहणारा मुनींमधील नारायण तो मी. नि÷sने ब्रह्मचर्यव्रत धारण करून राहणारे जे सनत्कुमार तेही माझेच स्वरूप होत असे समज. सर्व प्राणिमात्रांना अभयदान देण्याचा क्रम ठेवणे, सर्व भूतांमध्ये आत्माराम तो मी असे समज, हाच संन्यासाचा मुख्य धर्म होय. पुरुषोत्तम म्हणतात की, तो धर्म स्वतः मीच आहे.
कायावाचामनेकरून कोणत्याही प्राण्याला दुःख न देता सुखच देणे याला संन्यासधर्म असे म्हणतात. गोविंद म्हणाले, तो संन्यासधर्म मी आहे. एखाद्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध बोध झालेला नसतो त्यामुळे तो दात ओठ चावून द्वंद्वे सहन करत असतो पण ती काही खरी क्षमा नव्हे. क्षमेचे स्वरूप ऐक. अंतःकरणांत परब्रह्माचा खरा ठसा उमटून जो बाहेर सर्व प्राणिमात्रांशी समानः भावाने वागतो, त्याची ती वृत्ती म्हणजेच क्षमा होय. ती क्षमा मी आहे. अशी क्षमा ज्याचेजवळ असते, त्याला द्वंद्वांची पीडा होत नाही. उद्धवा सत्य बोलण्याला फार महत्त्व आहे कारण सर्व जगामध्ये असत्यवादी मनुष्यच पातकी होय. असत्यामध्ये कोटय़वधी पातके भरलेली असतात. असत्याची गोष्ट अत्यंत खोटी असते. ती कोणीही मनावर घेत
नाही.
बहिर्मति असणे हे इहलोकी व परलोकीही खोटे नाणेच होय. ते ज्याने मनापासून सोडले, त्याला मी श्रीकृष्णसुद्धा वंदन करतो. सत्य भाषण करणे किंवा जे मनःपूर्वक मौन धारण करणे तेच गुह्यातील अत्यंत मोठे गुह्य होय. श्रीकृष्ण म्हणाले की ते गुह्य मी आहे. कारण सत्यावर प्रीती असणे हेच माझे आत्मगुह्य आहे.
ब्रह्मदेवाचा देह मनु आणि शतरूपा ह्या अगदी पहिल्या जोडप्याच्या रूपाने द्विभागात्मक झाला. नारायण म्हणतात, ते एकनि÷sने मनुष्यसृष्टि उत्पन्न करणारे जोडपे मीच होय.
क्रमशः