सावंतवाडी / प्रतिनिधी
सातोसे देऊळवाडी येथील विलास राघोबा नाईक ,(54) यांचे शुक्रवारी सायंकाळी 5. 30 वा. अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले . मुंबई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. माऊली क्रिकेट संघाचे ते माजी कर्णधार होते. शनिवारी सायंकाळी 4 वाजता सातोसे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.