वार्ताहर / कांदोळी
नेरूल परिसरात मोबाईल टॉवरला होत असलेल्या स्थानिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत असून गुरुवार दि. 28 रोजी ग्रामस्थांनी रस्त्यावर ठाण मांडून रस्ता अडवून धरला. शेवटी जिल्हाधिकाऱयांनी टॉवरसाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी काही ग्रामस्थाना म्हापसा कार्यालयात बोलावण्यात मात्र तेथे काहीच निर्णय न झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत रस्तारोको आंदोलन चालू होते.
नेरूल परिसरातील टॉवरला विरोध दर्शवत बुधवारी तारीख 27 सकाळी स्थानिकांनी या टॉवर कंपनीच्या प्रतिनिधींना जाब विचारत धारेवर धरले होते. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी येत्या दोन दिवसात मोबाईल टॉवर हटविण्याचे आश्वासन दिले होते. याचवेळी मामलेदार राजाराम परब, उपनिरीक्षक सीताराम माळीक हे घटनास्थळी उपस्थित राहून त्यांनी ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता व लवकरच वरि÷ाकडून यासंबंधी चर्चा घडवून आमचा निर्णय दुसऱया दिवशी सकाळी दहा वाजता कळविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. मात्र संबंधित निर्णय न कळविल्यामुळे नाही. यापुढे कायदा हातात घेत मोबाईल टॉवर हटविण्याचा इशारा देण्यात आला.
साळगावचे आमदार केदार नाईक याबाबत बोलताना म्हणाले, मोबाईल टॉवर उभारण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेणे जरुरीचे होते. प्रत्येक वेळी लोकांना खोटा प्रचार करून टॉवरचे बांधकाम शेवटी एका रात्रीत पूर्ण केले. सदर लवकरात लवकर हटविण्यात यावा.
सदर टॉवर पंचायत मंडळाने, टॉवर कंपनीने व राज्य शासनाने लोकांना विश्वासात न घेता टॉवरची उभारणी केली आहे, असे नेरूलवासीयांना पूर्णपणे फसविले आहे. त्यामुळे जोपर्यंत सदर टॉवर हटविला जाणार नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण इथेच थांबणार आहोत, माजी सरपंच शशिकला गोवेकर, रोहन कळंगुटकर व उमेश कोरगावकर यांनी सांगितले.
पंचायत मंडळाच्या मासिक बैठकीत सदर टॉवरला सर्व समक्ष नकार दिला होता. सकाळी जिल्हाधिकाऱयांनी ग्रामस्थाना दोन दिवसात सदर टॉवर हटविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ग्रामस्थाना लेखी स्वरूपात काहीच न दिल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले, असे त्यांनतर पंचायतीचे सरपंच रेश्मा कलंगुटकर यांनी सांगितले.