गोकाक – अंकलगी आणि अक्कतंगेरहाळ या गावांचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. मात्र याला अक्कतंगेरहाळलच्या ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. सुवर्णसौध समोर आज निदर्शने करत अंकलगी व अक्कतंगेरहाळ ही गावे नगर पंचायतीचा दर्जा मिळण्यास पात्र नसल्याचा आरोप केला. याला ग्रामस्थांनीही आक्षेप घेतला असला तरी, याबाबत कारवाई करण्यासाठी गोकाकचे राज्य निरीक्षक यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी चुकीची माहिती दिली आहे. या ग्रामीण भागात नगर पंचायतीचा दर्जा देण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत. या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करून अक्कतंगेरहाळला नगर पंचायतीचा दर्जा न देण्याची मागणी केली. यावेळी अक्कतंगेरहाळचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articlecovid-19; आता नाकाद्वारे घ्या, करोना प्रतिबंधात्मक डोस
Next Article लोकसभा-राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब