Villagers should be vigilant about kidnapping of school children – Sarpanch Akram Khan
शाळकरी मुलांना चॉकलेट देऊन अपहरणाच्या बातम्या दिवसेंदिवस वाढत आहेत त्यातच बांदा निमजगा येथील शाळकरी मुलाला दोघा दुचाकीस्वारांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याची बाब उघड झाल्याने बांदा येथील ग्रामस्थ युवकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन बांदा सरपंच अक्रम खान यांनी केले आहे. लवकरात लवकर याबाबत सर्व शाळा व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक पालक यांची प्रत्येक शाळेत बैठक घेणार असल्याचे खान यांनी सांगितले. कोणीही अनोळखी वाहन,व्यक्ती शाळा परिसरात दिसल्यास त्याला रोखून ठेवून पोलीस किंवा आपल्याशी संपर्क करावे असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
बांदा / प्रतिनिधी