ऑनलाईन टीम/तरुण भारत
ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे, त्या राज्यात भोंगे का हटवले जात नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन नियमानुसार कोणतीही कारवाई होत नाही, असा सवाल विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया (praveen togadia) यांनी भाजपला केला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी भोंग्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत भाजपलाच प्रतिप्रश्न केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार भोंग्यांबाबत न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र महाराष्ट्रात भाजपचे (bjp) राज्य असताना भोंगे का हटवले नाहीत, असा प्रश्न तोगडीया यांनी उपस्थित केला आहे.
मोहन भागवत यांनी यांनी काही दिवसांपूर्वी 15 वर्षात अखंड भारत होईल, असं म्हटलं होतं. त्यांचं स्वागत आणि समर्थन करत असल्याचं तोगडीयांनी स्पष्ट केलं. मात्र सत्ता मध्ये असताना वचन दिलं जातं. सत्ता आणि सेना असताना काहीही करता येतं, असा घरचा आहेर प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांच्या सभेनंतर भोंग्यावरून वाद सुरु
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडव्याच्या सभेनंतर भोंग्यावरून वाद वाढतच चालला आहे. राज यांनी ठाण्याच्या सभेत येत्या तीन तारखेपर्यंत भोंगे उतरवण्यासंबंधी अल्टिमेटमही दिला आहे. सध्या राज्य सरकार आणि गृहमंत्रालयात यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची देखील बैठक होणार आहे. राज्य सरकार यासाठी नियमावलीही जारी करणार आहे.