इंडस टॉवर्सचा कर्जाची परतफेड न केल्यास सेवा बंद करण्याचा इशारा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
व्होडाफोन-आयडियाच्या 25 कोटींहून अधिक ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कर्जबाजारी कंपनीला नोव्हेंबरपासून सेवा बंद करावी लागू शकते. प्रत्यक्षात इंडस टॉवर्स कंपनीच्या टॉवर्सचा वापर करणाऱया व्होडाफोन आयडियाने कर्ज न भरल्यास सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
इंडस टॉवरवर व्होडाफोन आयडियाचे जवळपास 7 हजार कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज आहे. या कंपनीत भारती एअरटेलचा सर्वात मोठा हिस्सा 47.76 टक्के आणि व्होडाफोन ग्रुपचा 21.05 टक्के हिस्सा आहे. व्होडाफोन व आयडियाकडे देखील यापूर्वी इंडसटॉवरमध्ये 11.5 टक्के हिस्सा होता, परंतु कंपनीने 2 वर्षांपूर्वी इंडस टॉवरचे भारती इन्फ्राटेलमध्ये विलीनीकरण करताना हा हिस्सा विकला होता.
कंपनीवर 1.99 लाख कोटींचे कर्ज
30 सप्टेंबर 2021 पर्यंत व्हिआयएलचे एकूण कर्ज 1,94,780 कोटी रुपये होते. एप्रिल-जून 2022 च्या तिमाहीच्या शेवटी हे कर्ज 1,99,080 कोटी रुपये झाले.
जिओनंतर दोन कंपन्या एक झाल्या
रिलायन्स जिओच्या आगमनानंतर, आयडिया आणि व्होडाफोन यांचे एकत्रीकरण झाले. यानंतर भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सह चार दूरसंचार कंपन्यांचे देशात वर्चस्व राहिले. व्होडाफोन आयडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे.
व्होडा-आयडियाचे वापरकर्त्यांची संख्या घटली
टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओचा दबदबा वाढत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मते, व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या 15.4 लाख ग्राहकांनी जुलैमध्ये नेटवर्क सोडले आहे. यासह, कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 25.51 कोटी आहे. त्याचवेळी, जिओने आपल्या नेटवर्कमध्ये 29.4 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. यासह, जिओ नेटवर्कचा वापर करणाऱयांची संख्या 41.59 कोटी झाली आहे. जुलैमध्ये 5.1 लाख नवीन ग्राहक भारती एअरटेलमध्ये सामील झाले. त्यानंतर एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 36.34 कोटी झाली आहे.