मतदारराजा जागा हो
- निवडणूक विभागाचे कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी हवे
- मतदार यादीत नाव असल्याची खात्री आवश्यक
- व्हीव्हीपॅट व ईव्हीएमद्वारे मतदान नको
- मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर करावा
- तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या अधिकाऱयांची बदली क्हायला हवी
- व्होटर्स हेल्पलाईनचा आधार घ्यावा
आगामी निवडणुका लवकरच जाहीर होतील. त्या दृष्टीने अनेक इच्छुक उमेदवार एनकेनप्रकारे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारांना खूष करण्याच्या दृष्टीने आतापासूनच वेगवेगळी शक्कल लढविली जात आहे. मात्र, आपल्या शहराच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडणे आणि त्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.
बेळगाव : महापौर निवडणुकीवेळी प्रभागाची पुनर्रचना करताना एकाच घरातील व्यक्ती दोन प्रभागात विखुरल्या गेल्याची उदाहरणे आहेत. या शिवाय अनेकांची नावेही यादीतून वगळण्यात आली. मतदानाचे कर्तव्य हे पवित्र कर्तव्य आहे. त्यामुळे मतदारांनी सावध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या हेतूने हे सदर सुरू होत आहे.
सध्या मतदार यादी पडताळणी सुरू आहे. प्रत्येक सज्ञान मतदाराने या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे 8 डिसेंबरपूर्वी तपासून घ्यायला हवे. पद्धतशीरपणे मतदार यादीतून काही नावे वगळण्यात आल्याचे वृत्त चर्चेत आहे. पुढील निवडणुकीमध्ये योग्य उमेदवाराची निवड करण्याच्यादृष्टीने सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी केले आहे.
नागरिकांच्या समस्येत आणखीनच भर
या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. मात्र, हे कर्तव्य पार पाडण्याकडेच शहरवासीयांचे दुर्लक्ष होत आहे. अशातच मनपाच्या निवडणुकीमुळे एकाच कुटुंबातील मतदारांची विभागणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका निवडणूक प्रभाग रचना झाल्यानंतर मतदार यादीची विभागणी करण्यात आली. पण यामध्ये काही मतदारांची नावे वगळण्यात आली होती. असंख्य मतदारांची नावे दुसऱया प्रभागात असल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. प्रशासनाने केलेल्या घोळाचा फटका शहरवासीयांना बसला आहे. आधीच मतदानाचा हक्क बजावण्याकडे दुर्लक्ष करणाऱया नागरिकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे.
सध्या 2023 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आधारलिंक करणे, नवीन मतदारांची नावे दाखल करणे, मृत व्यक्तींची नावे कमी करणे, चुकीच्या नावांची दुरुस्ती करणे अशी विविध कामे सध्या सुरू आहेत. महापालिका व्याप्तीमध्ये शहरातील दक्षिण आणि उत्तर मतदार संघ येत असल्याने मुख्य कार्यालयात स्थलांतर करण्यात आलेल्या निवडणूक विभागात हे कामकाज सुरू आहे. पूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात हे कार्यालय असल्याने कोणत्याही समस्यांचे निवारण करण्यासाठी सोयीचे ठरत होते. मात्र, निवडणूक कार्यालय मुख्य कार्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. हे कार्यालय दुसऱया मजल्यावर असल्याने सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयाची माहिती मिळत नाही. त्याचप्रमाणे दुसऱया मजल्यावर पायऱया चढून जाण्यास वृद्ध मतदारांना अशक्मय आहे. त्यामुळे मतदान करण्याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक आता मतदार यादीत नाव आहे की नाही किंवा नसल्यास नाव दाखल करण्यासाठी कार्यालयाकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागते.
महापालिका निवडणुकीच्या वेळी हजारो मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे बऱयाच मतदारांची नावे जाणिवपूर्वक वगळण्यात आली होती. एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळय़ा प्रभागात जोडली गेली. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. सजग नागरिकांनी आता मतदार यादीत आपले नाव आहे का? हे तपासण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तत्पूर्वी दि. 8 डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नाव आहे की नाही हे पाहून त्याबाबत तक्रार दाखल करावी, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
मतदार यादीत नाव असणे गरजेचे
मतदार यादीत नाव नसल्यास नाव दाखल करण्यासाठी अर्ज करणे, चुकीचा उल्लेख असल्यास दुरुस्ती करणे, अन्य प्रभागाच्या मतदार यादीत नाव असल्यास ते दुरुस्त करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रथम मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रत्येक नागरिकांनी मतदार यादीत नाव तपासण्याची गरज आहे. लोकशाही पद्धतीने निवडणुका होत असल्याने नाव मतदार यादीत असल्यासच हक्क बजावता येणार आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीवेळी तसेच प्रत्येक निवडणुकीत व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम (निवडणूक मतदान यंत्र) वर मतदान घेण्यात येत आहे. मात्र, मतदान यंत्रातील घोटाळय़ामुळे नागरिकांचा निवडणुकीवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका व्हीव्हीपॅट व ईव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकेचा वापर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये काही अधिकारी वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. त्यामुळे भ्रष्ट कारभाराला ऊत आला आहे. भ्रष्टाचार रोखण्यासह शासन व्यवस्थितपणे चालण्यासाठी सरकारने बदली प्रक्रियेची नियमावली निश्चित केली आहे. पण या नियमावलीचे उल्लंघन शासनच करीत आहे. अनेक अधिकारी तीन वर्षांहून अधिक काळ एकाच कार्यालयात असतानाही त्यांची बदली केली जात नाही. बेळगाव जिह्यात एकाच कार्यालयात तीन वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या अधिकाऱयांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अनेक सुविधा उपलब्ध
निवडणूक आयोगाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मतदारांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्याची गरज आहे. मतदारांना प्रत्येक गोष्ट सोयीची करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मतदान यादीत नाव दाखल करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्याकरिता शासनाने ‘व्होटर्स हेल्पलाईन’ उपलब्ध केली आहे. या माध्यमातून मतदार यादी तपासणे तसेच नाव दाखल अथवा कमी करण्याची सुविधा या ऑनलाईन ऍपद्वारे करता येऊ शकते. त्याचप्रमाणे ‘नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल’च्या माध्यमातून मतदार यादीची पडताळणी करता येऊ शकते. शासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांचा उपयोग करून मतदारांनी मतदार यादीची तपासणी करावी. यादीत आपले नाव आहे का? याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुळगुंद यांनी केले आहे.